शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाराष्ट्र, पंजाब पाठोपाठ कर्नाटकच्या शेतक-यांनाही कर्जमाफी

By admin | Updated: June 21, 2017 15:45 IST

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब पाठोपाठ आता कर्नाटक सरकारने सुद्धा शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 21 - उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब पाठोपाठ आता कर्नाटक सरकारने सुद्धा शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. 
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी याबाबत निर्णय जाहीर केला. यामध्ये राज्यातील सर्व शेतक-यांचे प्रत्येकी 50 हजार रुपयांपर्यंतचे पीक कर्जमाफ करण्यात येणार आहे. त्यासाठी 8 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कर्जमाफीचा फायदा ज्या शेतक-यांनी सहकार बॅंकाकडून कर्ज घेतले आहे, त्यांना होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यानंतर कर्जमाफी करणारे कर्नाटक चौथे राज्य ठरले आहे.
देशात उत्तर प्रदेश सरकारने सुरुवातीला शेतक-यांना कर्जमाफी दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारले होते. या शेतक-यांच्या आंदोलनापुढे महाराष्ट्र सरकार झुकले आणि शेतकऱ्यांना निकषांसह सरसकट कर्जमाफी देण्याचा तत्वत: निर्णय घेतला. त्यानंतर पंजाबमधील पाच एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतक-यांना सुद्धा दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी करण्याचा निर्णय पंजाब सरकारने जाहीर केला. दरम्यान, मध्य प्रदेश आणि तामीळनाडूमधील शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, याबाबतील त्या-त्या राज्यातील सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. 
 
(१० हजाराच्या कर्जासाठीच्या निकषात सुधारणा)