शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपचं मन की बात आता 'धन की बात' झालं - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 21:28 IST

नवी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि कपिल सिबल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली. 

नवी दिल्ली - कर्नाटकातला सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे.  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी आमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सरकार स्थापन करण्याची स्वप्नं धुळीला मिळण्याची शक्यता आहे. याच धर्तीवर नवी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि कपिल सिबल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर टीका केली.  राज्यपालांच्या निर्णयामुळे कोर्टाचा अवमान झाल्याची भावना काँग्रेसने व्यक्त केली आहे. राज्यपालांवर सरकारचा दबाव असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. मोदींची 'मन की बात' आता 'धन की बात' झाल्याची टीकाही काँग्रेसने केली.

 आम्ही राज्यपालांना पत्र देऊनही आमचं मत विचारात घेतलं गेलं नाही. संविधानाचं उल्लंघन होऊन न देण्याची जबाबदारी राज्यपालांची आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन होऊ न देणं राज्यपालांच्या हाती आहे' असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले.

जेडीएस आणि काँग्रेसने राज्यपालांची भेट घेऊन पूर्ण बहुमत मिळाल्याचा दावा केला होता. आम्ही विधीमंडळ सदस्यांच्या नावांची यादीही सुपूर्द केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतही आम्ही राज्यपालांना सोपवली होती. त्यामुळे ते संविधान आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बांधील आहेत', असं काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.