शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

Karnataka Election Results: काँग्रेसनं याआधीही 'असाच' केला होता भाजपाचा 'गेम', पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 12:24 IST

कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भाजपाचंच 'शाही तंत्र' वापरून काँग्रेसनं त्यांची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, पण....

नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, पण काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी करत त्यांची खुर्ची खेचण्याची खेळी केलीय. पण, काँग्रेसनं भाजपाला असाच धक्का २०१३ मध्येही दिला होता. त्यामुळे त्या निवडणुकीत 'टॉप' येऊनही सत्तास्थापनेवेळी ते 'फ्लॉप' ठरले होते. 

कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भाजपाचंच 'शाही तंत्र' वापरून काँग्रेसनं त्यांची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोवा, मेघालय, मणिपूरमध्ये भाजपानं जे राजकारण केलं, त्याचा 'बदला' काँग्रेस कर्नाटकात घेतोय, असंही बोललं जातंय. पण, हे जोडाजोडीचं आणि फोडोफोडीचं राजकारण अजिबातच नवं नाही. ते भाजपानं शोधलंय असं तर अजिबातच नाही. उलट, भाजपानं गोवा, मेघालय, मणिपूरमध्ये जे केलं, तेच काँग्रेसनं २०१३च्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालांनंतर केलं होतं.   

दिल्लीतील ७० जागांपैकी ३२ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आम आदमी पार्टीनं २८ जागा जिंकल्या होत्या. भाजपाने काही हालचाली करायच्या आधीच, आठ जागा जिंकलेल्या काँग्रेसनं 'आप'ला बाहेरून पाठिंबा जाहीर करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. अर्थात, हे सरकार फक्त ४९ दिवस टिकू शकलं होतं. त्यानंतर, दिल्लीत पुन्हा निवडणूक झाली होती आणि त्यात 'आप'नं मुसंडी मारली होती. 

कर्नाटकमधील मतमोजणीत १०४ जागांपर्यंत पोहोचलेल्या भाजपाला बहुमतासाठी आठ आमदारांची गरज आहे. याउलट, काँग्रेस (७८) आणि जेडीएसचं (३७) एकत्रित संख्याबळ ११५ होतंय. दोघांनीही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर, राजकीय घडामोडींना वेग आलाय. आत्ताच्या घडीला काँग्रेस-जेडीएसचं पारडं जड असलं, तरी काहीही घडू शकतं. 

दरम्यान, निवडणूक निकालात अव्वल ठरलेला पक्ष सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याची अलीकडच्या काळातील काही उदाहरणं....    

मेघालय (२०१८)एकूण जागा - ६०काँग्रेस २१ जागा जिंकून ठरला सर्वात मोठा पक्ष. पण, १९ जागा जिंकणाऱ्या एनपीपीने भाजपा (२), यूडीपी (६) आणि तीन अन्य आमदारांना सोबत घेऊन स्थापन केलं सरकार.

मणिपूर (२०१७)एकूण जागा - ६०काँग्रेसनं सर्वाधिक २८ जागा जिंकल्या. 'मॅजिक फिगर'पासून ते फक्त तीन जागा दूर होते. पण, २१ जागा जिंकणाऱ्या भाजपानं त्यांना धक्का दिला. एनपीपी, एनपीएफ आणि एलजेपी यांच्याशी हातमिळवणी करत त्यांनी सरकार स्थापन केलं. 

गोवा (२०१७)एकूण जागा  - ४० काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. भाजपाला १३ जागांपर्यंतच मजल मारता आली होती. पण अमित शहांनी एका रात्रीत सगळं गणितच बदलून टाकलं. मगोप, अन्य आणि तीन अपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपाने गोव्यातील सत्ता कायम राखली होती.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८