शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

Karnataka Election Results: काँग्रेसनं याआधीही 'असाच' केला होता भाजपाचा 'गेम', पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 12:24 IST

कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भाजपाचंच 'शाही तंत्र' वापरून काँग्रेसनं त्यांची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, पण....

नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, पण काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी करत त्यांची खुर्ची खेचण्याची खेळी केलीय. पण, काँग्रेसनं भाजपाला असाच धक्का २०१३ मध्येही दिला होता. त्यामुळे त्या निवडणुकीत 'टॉप' येऊनही सत्तास्थापनेवेळी ते 'फ्लॉप' ठरले होते. 

कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भाजपाचंच 'शाही तंत्र' वापरून काँग्रेसनं त्यांची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोवा, मेघालय, मणिपूरमध्ये भाजपानं जे राजकारण केलं, त्याचा 'बदला' काँग्रेस कर्नाटकात घेतोय, असंही बोललं जातंय. पण, हे जोडाजोडीचं आणि फोडोफोडीचं राजकारण अजिबातच नवं नाही. ते भाजपानं शोधलंय असं तर अजिबातच नाही. उलट, भाजपानं गोवा, मेघालय, मणिपूरमध्ये जे केलं, तेच काँग्रेसनं २०१३च्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालांनंतर केलं होतं.   

दिल्लीतील ७० जागांपैकी ३२ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आम आदमी पार्टीनं २८ जागा जिंकल्या होत्या. भाजपाने काही हालचाली करायच्या आधीच, आठ जागा जिंकलेल्या काँग्रेसनं 'आप'ला बाहेरून पाठिंबा जाहीर करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. अर्थात, हे सरकार फक्त ४९ दिवस टिकू शकलं होतं. त्यानंतर, दिल्लीत पुन्हा निवडणूक झाली होती आणि त्यात 'आप'नं मुसंडी मारली होती. 

कर्नाटकमधील मतमोजणीत १०४ जागांपर्यंत पोहोचलेल्या भाजपाला बहुमतासाठी आठ आमदारांची गरज आहे. याउलट, काँग्रेस (७८) आणि जेडीएसचं (३७) एकत्रित संख्याबळ ११५ होतंय. दोघांनीही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर, राजकीय घडामोडींना वेग आलाय. आत्ताच्या घडीला काँग्रेस-जेडीएसचं पारडं जड असलं, तरी काहीही घडू शकतं. 

दरम्यान, निवडणूक निकालात अव्वल ठरलेला पक्ष सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याची अलीकडच्या काळातील काही उदाहरणं....    

मेघालय (२०१८)एकूण जागा - ६०काँग्रेस २१ जागा जिंकून ठरला सर्वात मोठा पक्ष. पण, १९ जागा जिंकणाऱ्या एनपीपीने भाजपा (२), यूडीपी (६) आणि तीन अन्य आमदारांना सोबत घेऊन स्थापन केलं सरकार.

मणिपूर (२०१७)एकूण जागा - ६०काँग्रेसनं सर्वाधिक २८ जागा जिंकल्या. 'मॅजिक फिगर'पासून ते फक्त तीन जागा दूर होते. पण, २१ जागा जिंकणाऱ्या भाजपानं त्यांना धक्का दिला. एनपीपी, एनपीएफ आणि एलजेपी यांच्याशी हातमिळवणी करत त्यांनी सरकार स्थापन केलं. 

गोवा (२०१७)एकूण जागा  - ४० काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. भाजपाला १३ जागांपर्यंतच मजल मारता आली होती. पण अमित शहांनी एका रात्रीत सगळं गणितच बदलून टाकलं. मगोप, अन्य आणि तीन अपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपाने गोव्यातील सत्ता कायम राखली होती.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८