शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

दहशतवादाच्या समस्येला भारतच जबाबदार; कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींचं तर्कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 13:26 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारबरोबर असल्याचं म्हटलं होतं.

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारबरोबर असल्याचं म्हटलं होतं. परंतु विरोधकांमध्ये काही नेते असेही आहेत, जे दहशतवादाविरोधातील लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी असंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. पहिल्यांदा आपल्या देशातील दहशतवाद संपवा, असं ते मोदींना उद्देशून म्हणाले आहेत.पुलवामा हल्ल्यानंतर पूर्ण देशात जनक्षोभ उसळतोय. जनता पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे. सीआरपीएफच्या शहीद जवानांचा बदला घेण्याची इच्छा भारतीयांमध्ये प्रबळ आहे. परंतु कुमारस्वामी वादग्रस्त विधान करून या दहशतवादविरोधातील लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुमारस्वामी म्हणाले, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानं या घटनेचं दुःख कमी होणार नाही. सरकारनं अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक पावलं उचलली पाहिजेत. पहिल्यांदा आपण आपल्या देशातल्या दहशतवादाच्या समस्येचं समाधान शोधलं पाहिजे.14 फेब्रुवारीला पुलवाम्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना कडक शब्दांत संदेश दिला होता. दहशतवाद्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना त्यांच्या कृत्याची नक्कीच शिक्षा मिळेल. त्यानंतर राहुल गांधींहीही आम्ही सरकारबरोबर असल्याचं सांगितलं. पुलवामा हल्ल्यानंतर पूर्ण देशा आणि विरोधी पक्ष सरकारबरोबर आहे. परंतु कुमारस्वामींनी त्यांच्याविरोधात विधान केलं आहे. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी