शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाच्या समस्येला भारतच जबाबदार; कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींचं तर्कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 13:26 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारबरोबर असल्याचं म्हटलं होतं.

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारबरोबर असल्याचं म्हटलं होतं. परंतु विरोधकांमध्ये काही नेते असेही आहेत, जे दहशतवादाविरोधातील लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी असंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. पहिल्यांदा आपल्या देशातील दहशतवाद संपवा, असं ते मोदींना उद्देशून म्हणाले आहेत.पुलवामा हल्ल्यानंतर पूर्ण देशात जनक्षोभ उसळतोय. जनता पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे. सीआरपीएफच्या शहीद जवानांचा बदला घेण्याची इच्छा भारतीयांमध्ये प्रबळ आहे. परंतु कुमारस्वामी वादग्रस्त विधान करून या दहशतवादविरोधातील लढाईला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुमारस्वामी म्हणाले, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानं या घटनेचं दुःख कमी होणार नाही. सरकारनं अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक पावलं उचलली पाहिजेत. पहिल्यांदा आपण आपल्या देशातल्या दहशतवादाच्या समस्येचं समाधान शोधलं पाहिजे.14 फेब्रुवारीला पुलवाम्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना कडक शब्दांत संदेश दिला होता. दहशतवाद्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना त्यांच्या कृत्याची नक्कीच शिक्षा मिळेल. त्यानंतर राहुल गांधींहीही आम्ही सरकारबरोबर असल्याचं सांगितलं. पुलवामा हल्ल्यानंतर पूर्ण देशा आणि विरोधी पक्ष सरकारबरोबर आहे. परंतु कुमारस्वामींनी त्यांच्याविरोधात विधान केलं आहे. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी