शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

‘अर्जुन’ व्हा अन् भविष्य लक्षात घेत मतदान करा; प्रियांका गांधींचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:39 IST

प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले.

कनकगिरी (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे नेते केवळ नको ते मुद्दे उकरून काढत आहेत, मात्र ते ‘४० टक्के कमिशन’ घेणाऱ्या सरकारवर आणि जनतेच्या कामाबद्दल बोलत नाहीत. त्यामुळे जनतेने कर्नाटकचे ‘अर्जुन’ होत केवळ आपले भवितव्य लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी केले आहे. त्या कोप्पल जिल्ह्यातील कनकगिरी भागात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना बोलत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले. आज काही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत, तिथेही त्यांची वेगळी ओळख आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्तीसगडमध्ये आमच्या सरकारची ओळख निर्माण झाली आहे. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन सरकारच्या नावावर चालते ही खेदाची आणि शरमेची बाब नाही का?, असे त्या म्हणाल्या.

जनतेच्या प्रश्नावर बोलागेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे इतर मोठे नेते जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. कधी ते धर्माबद्दल बोलतात, मात्र तुमच्या विकासाच्या कामाबद्दल बोलले जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष विचलित न करता भविष्य लक्षात घेत मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

कमिशनचे सरकार हे ठेकेदारांनी नाव दिलेइतर कोणत्याही पक्षाने भाजप सरकारला ४० टक्के कमिशनचे सरकार हे नाव दिले नाही. ते ठेकेदारांनी दिले आहे. त्यांना ४० टक्के कमिशन द्यावे लागते. इतर अनेक भरतीत अनियमितता झाली आहे. या सरकारमध्ये प्रत्येक पदाचे रेट ठरलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी