शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्जुन’ व्हा अन् भविष्य लक्षात घेत मतदान करा; प्रियांका गांधींचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:39 IST

प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले.

कनकगिरी (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे नेते केवळ नको ते मुद्दे उकरून काढत आहेत, मात्र ते ‘४० टक्के कमिशन’ घेणाऱ्या सरकारवर आणि जनतेच्या कामाबद्दल बोलत नाहीत. त्यामुळे जनतेने कर्नाटकचे ‘अर्जुन’ होत केवळ आपले भवितव्य लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी केले आहे. त्या कोप्पल जिल्ह्यातील कनकगिरी भागात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना बोलत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले. आज काही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत, तिथेही त्यांची वेगळी ओळख आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्तीसगडमध्ये आमच्या सरकारची ओळख निर्माण झाली आहे. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन सरकारच्या नावावर चालते ही खेदाची आणि शरमेची बाब नाही का?, असे त्या म्हणाल्या.

जनतेच्या प्रश्नावर बोलागेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे इतर मोठे नेते जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. कधी ते धर्माबद्दल बोलतात, मात्र तुमच्या विकासाच्या कामाबद्दल बोलले जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष विचलित न करता भविष्य लक्षात घेत मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

कमिशनचे सरकार हे ठेकेदारांनी नाव दिलेइतर कोणत्याही पक्षाने भाजप सरकारला ४० टक्के कमिशनचे सरकार हे नाव दिले नाही. ते ठेकेदारांनी दिले आहे. त्यांना ४० टक्के कमिशन द्यावे लागते. इतर अनेक भरतीत अनियमितता झाली आहे. या सरकारमध्ये प्रत्येक पदाचे रेट ठरलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी