शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

‘अर्जुन’ व्हा अन् भविष्य लक्षात घेत मतदान करा; प्रियांका गांधींचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:39 IST

प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले.

कनकगिरी (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे नेते केवळ नको ते मुद्दे उकरून काढत आहेत, मात्र ते ‘४० टक्के कमिशन’ घेणाऱ्या सरकारवर आणि जनतेच्या कामाबद्दल बोलत नाहीत. त्यामुळे जनतेने कर्नाटकचे ‘अर्जुन’ होत केवळ आपले भवितव्य लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी केले आहे. त्या कोप्पल जिल्ह्यातील कनकगिरी भागात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना बोलत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले. आज काही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत, तिथेही त्यांची वेगळी ओळख आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्तीसगडमध्ये आमच्या सरकारची ओळख निर्माण झाली आहे. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन सरकारच्या नावावर चालते ही खेदाची आणि शरमेची बाब नाही का?, असे त्या म्हणाल्या.

जनतेच्या प्रश्नावर बोलागेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे इतर मोठे नेते जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. कधी ते धर्माबद्दल बोलतात, मात्र तुमच्या विकासाच्या कामाबद्दल बोलले जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष विचलित न करता भविष्य लक्षात घेत मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

कमिशनचे सरकार हे ठेकेदारांनी नाव दिलेइतर कोणत्याही पक्षाने भाजप सरकारला ४० टक्के कमिशनचे सरकार हे नाव दिले नाही. ते ठेकेदारांनी दिले आहे. त्यांना ४० टक्के कमिशन द्यावे लागते. इतर अनेक भरतीत अनियमितता झाली आहे. या सरकारमध्ये प्रत्येक पदाचे रेट ठरलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी