शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Indian Air Strike on Pakistan: कारगिल युद्ध ते एअर स्ट्राईक; धनोआ यांची दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 12:01 IST

जेव्हा अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं, अशी भावना दोन वर्षांपूर्वी कारगिल विजय दिवासानिमित्त दिलेल्या मुलाखतीत बी. एस. धनोआ यांनी व्यक्त केली होती.

ठळक मुद्देपुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला दणका दिला आहे.  'मिराज2000' च्या 12 विमानांनी जैश ए मोहम्मदचं अल्फा-3 नियंत्रण कक्ष आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.कारगिल युद्धावेळी विंग कमांडर असलेल्या धनोआ यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली हाती.

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला दणका दिला आहे. आज मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान 'मिराज2000' विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. 'मिराज2000' च्या 12 विमानांनी जैश ए मोहम्मदचं अल्फा-3 नियंत्रण कक्ष आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे पाकिस्तानला कारगिल युद्धात धडा शिकवणाऱ्या बी. एस. धनोआ यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई करणं धाडसाचं मानलं जातं. मात्र हवाई दलाचे प्रमुख असलेल्या धनोआ यांना अशा कारवाईचा अनुभव आहे. कारगिल युद्धावेळी विंग कमांडर असलेल्या धनोआ यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली हाती. त्यावेळी त्यांनी लढाऊ विमानांच्या तुकडीचं यशस्वी नेतृत्व केलं होतं. जेव्हा अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं, अशी भावना दोन वर्षांपूर्वी कारगिल विजय दिवासानिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केली होती.

पाकिस्तानकडे एफ-16 ही अत्याधुनिक विमानं असताना, त्यांच्याकडून प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता असतानाही भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरने धडाकेबाज कारवाई केली. रात्रीच्या वेळी अशा कारवाया करणं आव्हानात्मक असतं. मात्र तरीही हवाई दलाने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली.

भारताची 'मिराज2000' विमानं बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमध्ये कारवाई करत असताना पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र या विमानांनी उड्डाण करण्याआधीच भारतीय हवाई दलाने कारवाई पूर्ण केली. कारगिलवेळी केलेल्या कारवाईचा अनुभव यावेळी धनोआ यांना कामी आला. 'जेव्हा तुम्हाला कारवाईची संधी मिळते, तेव्हा तुम्ही पूर्णपणे सज्ज असावं लागतं. तुम्ही आयुष्यभर या संधीची वाट पाहत असता. ज्यावेळी अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा तो स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो,' असं धनोआ यांनी कारगिलच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं होतं.

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला