शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लस देण्यास वैद्यकीय पथकासोबत तहसीलदार गावात पोहोचले अन् गावकरी पळाले; मग कसं झालं लसीकरण? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 12:03 IST

कोरोना विरोधी लढ्यात सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लसीकरण. पण देशातील काही खेड्यापाड्यांमध्ये लसीबाबत अजूनही गैरसमज पसरलेले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाल क्षेत्रातील अहेर गावात रविवारी पाहायला मिळाला.

कोरोना विरोधी लढ्यात सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लसीकरण. पण देशातील काही खेड्यापाड्यांमध्ये लसीबाबत अजूनही गैरसमज पसरलेले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाल क्षेत्रातील अहेर गावात रविवारी पाहायला मिळाला. गावात तहसीलदार वैद्यकीय पथकासोबत लसीकरणासाठी पोहोचले. पण वैद्यकीय पथकाला पाहून गावकऱ्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली तर काहींनी घराचे दरवाजेच लावून घेतले. काही गावकऱ्यांनी तर लस घेणं टाळण्यासाठी थेट शेतात पळ काढला. 

गावात एकच शांतता पसरली होती. तहसीलदारांच्या नेतृत्त्वाबाबत आरोग्य विभागाच्या पथकानं जेव्हा लसीकरण सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला. कुणीच लस घेण्यसाठी पुढे यायला तयार नव्हतं. अशावेळी तहसीलदारांना चक्क पोलिसांना पाचारण करावं लागलं. त्यानंतर गावातील मौलवींनी गावातील मशिदीवरुन उदघोषकाच्या सहाय्यानं लोकांना जागरुक करण्याचं काम केलं. त्यानंतर लोक लस टोचून घेण्यास पुढे येऊ लागले. 

गावात १२० लोकांचं लसीकरणपोलीस आणि मौलवींनी पुढाकार घेऊन लोकांना जागरुक केल्यानंतर आरोग्य विभागानं गावातील १२० लोकांना कोरोना विरोधी लसीचा डोस दिला. लसीबाबतची अफवा गावात पसरली होती. त्यामुळे कोणताही गावकरी लस घेण्यास पुढे येत नव्हता. रविवारी अहेर गावात लोकांमध्ये जनजागृतीसाठी तहसीलदार अनिक कुमार सरोज आरोग्य विभागाचे काही सदस्य पोहोचले. तहसीलदारांना पाहून गावकऱ्या थेट घरात पळाले आणि दरवाजे बंद करुन घेतले होते. तर काहीजण शेतात पळून गेले होते. 

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्याचं दरवाजे ठोठावले आणि लस घेण्यासाठी आग्रह केला. पण एकानाही इच्छा व्यक्त केली नाही. तहसीलदारांना पोलीस बोलवावे लागले. पण पोलिसांना पाचारण करुनही काम झालं नाही. गावकऱ्यांचा विरोध पाहता तहसीलदारांनी मशिदीत जाऊन मौलवींशी बातचित केली आणि त्यांना मशिदीवरील भोंग्यावरुन जनजागृती करण्याचं आवाहन केलं. 

कोरोना विरोधी लस घेतल्यानं कोरोना विषाणूचा धोका कसा कमी होतो. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सारं महत्त्व मौलवींनी गावकऱ्यांना पटवून दिलं. त्यानंतर लोक लस घेण्यास तयार झाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या