शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कन्हैय्या-गिरिराज लढाई म्हणजे लेफ्ट विरुद्ध राईट; पण 'तिसरा' उमेदवार देऊ शकतो 'टफ फाईट'

By बाळकृष्ण परब | Updated: April 15, 2019 18:15 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघातील लढती विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्यापैकी एक लढत आहे बिहारमधील बेगुसराय येथील. डाव्या पक्षांचा उमेदवार असलेल्या कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात भाजपाने कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या गिरिराज सिंह यांना उतरवल्याने येथील मुकाबला लेफ्ट विरुद्ध राईट असा झाला आहे.

- बाळकृष्ण परब यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघातील लढती विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्यापैकी एक लढत आहे बिहारमधील बेगुसराय येथील. डाव्या पक्षांचा उमेदवार असलेल्या कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात भाजपाने कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या गिरिराज सिंह यांना उतरवल्याने येथील मुकाबला लेफ्ट विरुद्ध राईट असा झाला आहे. त्यानिमित्ताने  गेल्या दोन चार वर्षांपासून जेएनयूपासून अनेक मंचांवर सुरू असलेली डाव्या आणि उजव्या विचारांची लढाई प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात पोहोचली आहे. मात्र बेगुसरायमध्ये केवळ डावे आणि उजवे अशी लढाई नाही तर त्या लढाईत तिसराही कोन आहे. तो कोन म्हणजे महागठबंधन. 

जेएनयूमध्ये कथित देशविरोधी घोषणांचे प्रकरण घडल्यानंतर डाव्या विद्यार्थी संघटनेचा नेता असलेल्या कन्हैया कुमारचे नाव देशपातळीवर पोहोचले. तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात कन्हैय्या कुमार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून आवाज उठवल्याने अल्पावधीतच कन्हैय्या कुमार हे नाव मोदीविरोधी आवाजाचा चेहरा बनले. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदीविरोधी पक्ष कन्हैय्यांना एकजुटीने पाठिंबा देऊन उमेदवारी देतील, असे वाटत होते. मात्र दीर्घकाळ रंगलेल्या बिहारमधील महाआघाडीच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर कन्हैय्या कुमार यांना महाआघाडीकडून उमेदवारी मिळालीच नाही. उलट राजदने बेगुसरायमध्ये तन्वीर हसन यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे डाव्या पक्षांना कन्हैया कुमार यांना स्वतंत्रपणे उमेदवारी जाहीर करावी लागली. तर भाजपाने या मतदारसंघात प्रखर हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या गिरिराज सिंह यांना मैदानात उतरवून या लढतीला उजवे विरुद्ध डावे असे रूप दिले आहे.

कन्हैया कुमार विरुद्ध गिरिराज सिंह अशी लढत निश्चित झाल्यावर मीडिया आणि सोशल मीडियाचे लक्ष बेगुसरायकडे जाणे साहजिकच होते. मात्र कन्हैया विरुद्ध गिरिराज असे चित्र  रंगवताना महागठबंधनच्या उमेदवाराकडे माध्यमांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.  बिहारमधील स्थानिक प्रसारमाध्यमे आणि स्थानिक पत्रकारांच्या मतांचा आढावा घेतल्यास बेगुसरायमध्ये कन्हैय्या कुमार विरुद्ध गिरिराज सिंह अशी थेट लढत न होता ती गिरिराज सिंह विरुद्ध तन्वीर हसन विरुद्ध कन्हैय्या कुमार अशी होण्याची शक्यता आहे, असे दिसते. त्यातही एकेकाळी बेगुसरायची ओळख 'बिहारचे लेनिनग्राड' अशी असली तरी आज तिथला डाव्यांचा जनाधार कमी झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आणि राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांना आव्हान देताना कन्हैया कुमारला फार मेहनत घ्यावी लागणार आहे, असा निष्कर्ष बिहारमधील स्थानिक माध्यमांच्या वृत्तांमधून निघत आहे. त्यामुळे या लढतीबाबतचे अनेकांचे आडाखे चुकण्याची शक्यता आहे. 

बेगुसरायचा इतिहास पाहिल्यास येथे अपवाद वगळता बहुतांश वेळा भूमिहार जातीच्या उमेदवारांचीच सरशी झाली आहे. या मतदारसंघात डाव्या पक्षांचे वर्चस्व असल्याने या मतदारसंघाला बिहारचे लेनिनग्राड असे म्हटले जात असे. मात्र गेल्या काही वर्षांत देशपातळी बरोबरच बेगुसरायमध्येही डाव्यांचा जनाधार आक्रसत चालला आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यास येथे डाव्या पक्षांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली होती. त्यावेळी भाजपाचे नेते भोला सिंह 4 लाख 28 हजार मतांसह विजयी झाले होते. राजदचे तन्वीर हसन 3 लाख 70 हजार मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले होते. तर तिसऱ्या स्थानी राहिलेले डाव्या पक्षांचे राजेंद्र प्रसाद सिंह यांना 1 लाख 92 हजार मते मिळाली होती.  एकंदरीत बेगुसरायमधील मतांची टक्केवारी आणि जातीय गणित पाहता या निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराचे पारडे जड आहे असे छातीठोकपणे सांगता येणार नाही.

तसेच मीडियाने येथे गिरिराज सिंह विरुद्ध कन्हैय्या कुमार असे चित्र उभे केले असले तरी येथील महाआघाडीच्या उमेदवाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाआघाडीच्य तन्वीर हसन यांनी 2014 लोकसभा निडणुकीत ऐन मोदी लाटेतही तन्वीर हसन केवळ 58 हजार मतांनी पराभूत झाले होते. यावेळीही तन्वीर हसन संपूर्ण शक्तीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा जनाधारही मजबूत आहे. 

भूमिहार बहुल बेगुसरायमध्ये आमनेसामने आलेले गिरिराज सिंह  आणि कन्हैया कुमार हे दोघेही भूमिहार जातीचेच आहेत. त्यामुळे आता या जातीमधील मतदार कोणाच्या मागे उभा राहतो हे पाहावे लागेल. त्यातही भाजपा, महाआघाडी आणि डावे पक्ष यांचा जनाधार ठरलेला आहे.  त्यामुळे या पक्षांचे पारंपरिक मतदार सहजपणे दुसरीकडे वळणे कठीण आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास कन्हैया कुमार यांना नवे मतदार खेचून अडचणी येतील. तर भूमिहार मतदारांमध्ये फूट पडल्यास त्याचा फटका गिरिराज सिंह यांना बसू शकतो. तसे झाल्यास डावे विरुद्ध उजव्यांच्या लढाईत महाआघाडीच्या तन्वीर हसन यांचे पारडे जड ठरू शकते.   

बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकनंतर  निर्माण झालेल्या देशभक्तीच्या लाटेचा प्रभाव कायम राहिल्यास तसेच कन्हैया कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या देशद्रोहाच्या आरोपांची हवा झाल्यास गिरिराज सिंह यांना विजयाची संधी मिळेल. तसेच  गिरिराज सिंह विजयी झाल्यास ते हिंदुत्ववाद्यांसाठी फार मोठे यश आणि डाव्यांसाठी धक्कादायक ठरेल. 

सध्या बेगुसरायमधील कानाकोपरा पिंजून काढत असलेले कन्हैया कुमार आपण कुठल्याही जातीपातीचे राजकारण करणार नसल्याचे सांगत आहेत. त्यांना मिळत असलेला प्रतिसादही उत्तम आहे. मात्र डाव्या पक्षांना गेल्यावेळी मिळालेल्या 1 लाख 92 हजार मतांवरून हे मताधिक्य हमखास विजय मिळवून देणाऱ्या पाच सव्वा पाच लाखांपर्यंत पोहोचवताना कन्हैया कुमार आणि डाव्यांचा कस लागणार आहे. पण कन्हैय्या कुमार यांनी बेगुसरायच्या मैदानात शड्डू ठोकल्याने येथील निवडणूक रंगतदार झाली आहे हे नक्की.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkanhaiya kumarकन्हैय्या कुमारBJPभाजपाbegusarai-pcबेगूसरायBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019