शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत कोंडी फोडा, अन्यथा...

By admin | Updated: November 18, 2016 01:36 IST

तीन दिवसांत पैशांच्या टंचाईची समस्या सोडवा किंवा नोटाबंदी मागे घ्या; अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा मुख्यमंत्रीद्वयांनी सरकारला दिला

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे पैशांसाठी देशभर गोंधळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर गुरुवारी घणाघाती हल्ला केला. तीन दिवसांत पैशांच्या टंचाईची समस्या सोडवा किंवा नोटाबंदी मागे घ्या; अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा मुख्यमंत्रीद्वयांनी सरकारला दिला. दोन्ही नेत्यांनी आझादपूर मंडी भागातील जाहीर सभेत मोदी सरकावर हल्ला चढविला. सरकारच्या या निर्णयामुळे देशाची आणीबाणीहूनही अधिक वाईट अवस्था झाली आहे. उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. शेतकरी संकटात सापडले असून, मजुरांची उपासमार सुरू आहे. लोकांना स्वत:चे पैसे मिळविण्यासाठी तासन्तास रांगेत धक्के खावे लागत असून, त्याची तक्रार करणाऱ्यांना ‘गद्दार’ ठरविले जात आहे, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला. मोदींना उद्योगपतींचे पाठीराखे संबोधत केजरीवाल यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. ‘नोटाबंदीच्या नावाखाली आणि देशभक्तीच्या आडूून ८ लाख कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात येत आहे,’ असे ते म्हणाले. अंबानी, अदानी आणि विजय मल्ल्या यासारख्या अब्जाधीशांना बँकांनी ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. ही सगळी रक्कम या अब्जाधीशांनी गिळंकृत केली असून, त्यामुळे बँका कंगाल होण्याच्या मार्गावर आहेत. मोदी सरकारने या कर्जाचा नवा आणाही वसूल केलेला नाही. उलट अब्जाधीशांचे १ लाख १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. आता त्याची भरपाई करण्यासाठी नोटाबंदीची टूम काढली आहे. लोकांनी आपले पैसे बँकेत जमा करावेत यासाठी ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. यामुळे बँकांत दहा लाख कोटी रुपये जमा होतील, असा सरकारचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)...तर आंदोलननोटाबंदीला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई संबोधून त्याच्या आडूून उद्योगपतींची कर्जे माफ करण्यात येत असून, कोट्यवधींचा घोटाळा सुरू आहे. हा अन्याय असून तो सहन केला जाणार नाही. सरकारने तीन दिवसांत लोकांचा त्रास दूर करावा किंवा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा संपूर्ण आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्याच्या सर्वेसर्वा ममता बॅनजी यांनी दिला. आम्ही जनतेच्या लढाईसाठी...आम्ही सामान्य नागरिकांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्हाला तुरुंगात टाका किंवा गोळ्या घाला. आम्ही माघार घेणार नाही. संघर्ष सुरूच ठेवू. एक व्यक्ती प्रामाणिक बाकी सगळे चोर. एक संत आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. -ममता बॅनर्जी

या पैशांतून मोदीजी आपल्या उद्योगपती मित्रांचे उर्वरित ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतील. हे सर्व सामान्य जनतेची छळवणूक करून केले जात आहे. - केजरीवाल