शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

तीन दिवसांत कोंडी फोडा, अन्यथा...

By admin | Updated: November 18, 2016 01:36 IST

तीन दिवसांत पैशांच्या टंचाईची समस्या सोडवा किंवा नोटाबंदी मागे घ्या; अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा मुख्यमंत्रीद्वयांनी सरकारला दिला

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे पैशांसाठी देशभर गोंधळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर गुरुवारी घणाघाती हल्ला केला. तीन दिवसांत पैशांच्या टंचाईची समस्या सोडवा किंवा नोटाबंदी मागे घ्या; अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा मुख्यमंत्रीद्वयांनी सरकारला दिला. दोन्ही नेत्यांनी आझादपूर मंडी भागातील जाहीर सभेत मोदी सरकावर हल्ला चढविला. सरकारच्या या निर्णयामुळे देशाची आणीबाणीहूनही अधिक वाईट अवस्था झाली आहे. उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. शेतकरी संकटात सापडले असून, मजुरांची उपासमार सुरू आहे. लोकांना स्वत:चे पैसे मिळविण्यासाठी तासन्तास रांगेत धक्के खावे लागत असून, त्याची तक्रार करणाऱ्यांना ‘गद्दार’ ठरविले जात आहे, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला. मोदींना उद्योगपतींचे पाठीराखे संबोधत केजरीवाल यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. ‘नोटाबंदीच्या नावाखाली आणि देशभक्तीच्या आडूून ८ लाख कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात येत आहे,’ असे ते म्हणाले. अंबानी, अदानी आणि विजय मल्ल्या यासारख्या अब्जाधीशांना बँकांनी ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. ही सगळी रक्कम या अब्जाधीशांनी गिळंकृत केली असून, त्यामुळे बँका कंगाल होण्याच्या मार्गावर आहेत. मोदी सरकारने या कर्जाचा नवा आणाही वसूल केलेला नाही. उलट अब्जाधीशांचे १ लाख १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. आता त्याची भरपाई करण्यासाठी नोटाबंदीची टूम काढली आहे. लोकांनी आपले पैसे बँकेत जमा करावेत यासाठी ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. यामुळे बँकांत दहा लाख कोटी रुपये जमा होतील, असा सरकारचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)...तर आंदोलननोटाबंदीला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई संबोधून त्याच्या आडूून उद्योगपतींची कर्जे माफ करण्यात येत असून, कोट्यवधींचा घोटाळा सुरू आहे. हा अन्याय असून तो सहन केला जाणार नाही. सरकारने तीन दिवसांत लोकांचा त्रास दूर करावा किंवा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा संपूर्ण आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्याच्या सर्वेसर्वा ममता बॅनजी यांनी दिला. आम्ही जनतेच्या लढाईसाठी...आम्ही सामान्य नागरिकांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्हाला तुरुंगात टाका किंवा गोळ्या घाला. आम्ही माघार घेणार नाही. संघर्ष सुरूच ठेवू. एक व्यक्ती प्रामाणिक बाकी सगळे चोर. एक संत आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. -ममता बॅनर्जी

या पैशांतून मोदीजी आपल्या उद्योगपती मित्रांचे उर्वरित ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतील. हे सर्व सामान्य जनतेची छळवणूक करून केले जात आहे. - केजरीवाल