शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

कंधार शहरी व ग्रामीण नागरिक तापीने बेजार

By admin | Updated: May 6, 2014 20:57 IST

कंधार : शहरात व ग्रामीण भागात नागरिकांना ताप आजाराने भलतेच बेजार केले आहे़ शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र असून ५ प्राथमिक आरोग्य केंद्रातही रूग्ण उपचार घेतानाचे चित्र समोर आले आहे़

कंधार : शहरात व ग्रामीण भागात नागरिकांना ताप आजाराने भलतेच बेजार केले आहे़ शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र असून ५ प्राथमिक आरोग्य केंद्रातही रूग्ण उपचार घेतानाचे चित्र समोर आले आहे़गत दीड ते दोन महिन्यापासून हवामान व वातावरणात सतत बदल होत आहे़ उष्णता, गारवा, गारपीट, पावसाची हजेरी आदींमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे़ त्यामुळे सर्दी-ताप-खोकला आदीला सामोरे जाण्याचा प्रसंग नागरिकांवर ओढवला आहे़ ग्रामीण रुग्णालयात बा‘ रुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण ४०० ते ५०० असतात़ त्यात गत काही दिवसांपासून तापीचे ३० ते ४० रुग्ण आहेत़ विशेष म्हणजे त्यातील ४ ते ५ जण टायफाईडचे असल्याचे सांगण्यात आले़ अंतररूग्ण विभागात दररोज १०-१५ रूग्ण दाखल होत आहेत़ रुग्णावर डॉ़संगीता भालेराव, डॉ़चंद्रकांत पाटील, डॉ़दत्तात्रय गुडमेवार, डॉ़बालाजी कागणे, डॉ़निकत फातेमा आदीजण उपचार करत आहेत़ शहरात होत असलेल्या मानार नदीतील पाणीपुरवठा दूषित आहे़ यापासून बचाव करण्यासाठी ऩप़ आता ध्वनीक्षेपाद्वारे पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन करत आहे़ ऩप़ लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागात आता तरी जावून नागरिकांना दिलासा देतील का, गटातटाचे राजकारण बाजूला सारून शहरवासियांचे प्रश्न सोडतील का हा खरा प्रश्न आहे़ ऩप़मध्ये विकासावर बोलणारे, समस्यांना वाचा फोडणारे नगरसेवक आहेत की नाहीत, अशी चर्चा नागरिक करीत आहेत़ एखाद्या प्रश्नाचा निपटारा होण्यासाठी ऩप़वर निघणारे मोर्चेही होत नाहीत़ नागरिकही उदासिन झाले आहेत़ स्वच्छतेबद्दल ऩप़ जशी तत्पर आहे, तसेच शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी असावी, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे़ रस्त्यावर उडणारा धुराळा उपहारगृहातील खाद्यपदार्थांवर जात आहे़ उघडे ठेवलेले अन्न व खाद्यपदार्थ सेवन करणे,दूषित पाणी पिणे आदीने नागरिक रोगाचा सामना करत आहेत़ शहरासोबतच ग्रामीण भागातही तापीचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे़१ ते ५ मे कालावधीत प्राथमिक आरोग्य कंेद्रात तापरूग्ण उपचारासाठ दाखल झाल्याची माहिती तालुका आरोग्यअधिकारी डॉ़ढवळे व अली यांनी दिली़ पानशेवडी प्रा़आ़केंद्रात-८, कुरूळा-५, उस्माननगर-१२, पेठवडज-२३ व बारूळ प्रा़आ़केंद्रात २५ रूग्ण वरील कालावधीत होते़ उपचारासाठी मुबलक औषधसाठा उपलब्ध असताना खाजगी रुग्णालयात दररोज १०० ते १५० रुग्ण कसे उपचार घेत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे़