शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

कलबुर्गी हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 5:25 AM

सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी २६ फेब्रुवारी कलबुर्गी हत्याकांडाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. याच पथकाकडे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास होता.

नवी दिल्ली : ज्येष्ठ विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सर्वोच्च न्यायालयात स्थितीदर्शक अहवाल सादर केला असून, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी फरार आहेत व त्यांना पत्ताच लागत नाही, असे म्हटले आहे.कलबुर्गी हे हम्पी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. ३० आॅगस्ट २०१५ रोजी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कल्याणनगर येथील निवासस्थानी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. न्या. आर.एफ. नरिमन व न्या. एस. रवींद्र भट यांच्या पीठासमोर हत्येबाबत स्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात आला. त्यात एसआयटीने म्हटले आहे की, या हत्याकांडाचा तपास पूर्ण झाला आहे व न्यायालयात आरोपपत्रही दाखल झालेले आहे.

पीठाने म्हटले आहे की, आम्ही एसआयटीच्या स्थितीदर्शक अहवालाचे अवलोकन केलेले आहे. यात म्हटले आहे की, दोन मुख्य आरोपी फरार आहेत व त्यांचा पत्ता लागत नाही. या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालय देखरेख करीत असल्यामुळे कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांच्या याचिकेत आता काही उरले नाही. त्यामुळे ती निरस्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास राष्टÑीय तपास यंत्रणा किंवा सीबीआयमार्फत करावा, या मागणीसाठी उमादेवी यांनी २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हत्याकांडाच्या तपासात राज्य पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही, असा त्यात दावा करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत गोविंद पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येत समानता आहे. त्यामुळे हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, असे त्यांचे म्हणणे होते.

सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी २६ फेब्रुवारी कलबुर्गी हत्याकांडाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. याच पथकाकडे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास होता. या दोन्ही हत्यांमध्ये समानता आहे, असे कर्नाटक सरकारने यापूर्वी म्हटले होते. कलबुर्गी हत्याकांडाचा तपास सर्वांत आधी राज्य पोलिसांची गुन्हे शाखा करीत होती. तथापि, एसआयटी सप्टेंबर २०१७ मध्ये बंगळुरूमध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करीत होता. उच्च न्यायालयाच्या धारवाड पीठाने कलबुर्गी हत्याकांडाच्या एसआयटी तपासावर देखरेख ठेवावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Murderखून