शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कलबुर्गी हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 05:25 IST

सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी २६ फेब्रुवारी कलबुर्गी हत्याकांडाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. याच पथकाकडे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास होता.

नवी दिल्ली : ज्येष्ठ विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सर्वोच्च न्यायालयात स्थितीदर्शक अहवाल सादर केला असून, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी फरार आहेत व त्यांना पत्ताच लागत नाही, असे म्हटले आहे.कलबुर्गी हे हम्पी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. ३० आॅगस्ट २०१५ रोजी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कल्याणनगर येथील निवासस्थानी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. न्या. आर.एफ. नरिमन व न्या. एस. रवींद्र भट यांच्या पीठासमोर हत्येबाबत स्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात आला. त्यात एसआयटीने म्हटले आहे की, या हत्याकांडाचा तपास पूर्ण झाला आहे व न्यायालयात आरोपपत्रही दाखल झालेले आहे.

पीठाने म्हटले आहे की, आम्ही एसआयटीच्या स्थितीदर्शक अहवालाचे अवलोकन केलेले आहे. यात म्हटले आहे की, दोन मुख्य आरोपी फरार आहेत व त्यांचा पत्ता लागत नाही. या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालय देखरेख करीत असल्यामुळे कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांच्या याचिकेत आता काही उरले नाही. त्यामुळे ती निरस्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास राष्टÑीय तपास यंत्रणा किंवा सीबीआयमार्फत करावा, या मागणीसाठी उमादेवी यांनी २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हत्याकांडाच्या तपासात राज्य पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही, असा त्यात दावा करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत गोविंद पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येत समानता आहे. त्यामुळे हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, असे त्यांचे म्हणणे होते.

सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी २६ फेब्रुवारी कलबुर्गी हत्याकांडाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. याच पथकाकडे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास होता. या दोन्ही हत्यांमध्ये समानता आहे, असे कर्नाटक सरकारने यापूर्वी म्हटले होते. कलबुर्गी हत्याकांडाचा तपास सर्वांत आधी राज्य पोलिसांची गुन्हे शाखा करीत होती. तथापि, एसआयटी सप्टेंबर २०१७ मध्ये बंगळुरूमध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करीत होता. उच्च न्यायालयाच्या धारवाड पीठाने कलबुर्गी हत्याकांडाच्या एसआयटी तपासावर देखरेख ठेवावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Murderखून