शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात मोठा राजकीय भूकंप; के. कवितांची पक्षातून हकालपट्टी, वडिलांनीच केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:04 IST

के कविता यांना मंगळवारी भारत राष्ट्र समिती पक्षामधून निलंबित करण्यात आलं.

K. Kavitha Suspended: तेलंगणामधून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या आणि आमदार के कविता यांना मंगळवारी भारत राष्ट्र समिती पक्षामधून निलंबित करण्यात आले. पक्षाची बदनामी करणाऱ्या कारवायांमुळे के. कविता यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी के. कविता यांना तात्काळ पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलंगणातील मुख्य विरोधी पक्ष भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबात खूप गोंधळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. के. चंद्रशेखर राव यांनी मुलगी कविता यांच्यावर मोठी कारवाई केली. पक्षाविरुद्धच्या वक्तव्यांमुळे आणि कारवायांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच के. कविता यांनी बीआरएस नेत्यांवर केसीआर यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप केला होता.

त्यानंतर आता के. कविता यांचे सध्याचे वर्तन आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाया पक्षाची प्रतिमा मलिन करत आहेत, त्यामुळे पक्षाध्यक्ष केसीआर यांनी कविताला तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीआरएस यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे २२ ऑगस्ट रोजीही कविता यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान बीआरएसने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यावेळी त्यांना अचानक टीबीजीकेएस म्हणजेच तेलंगणा बोग्गु गनी कर्मिका संगमच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी पक्षाच्या नेत्यांवर त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पदावरून काढून टाकणे हे राजकीयदृष्ट्या प्रेरित पाऊल होते असं के. कविता यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, के कविता यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांच्यावर गंभीर आरोप केले. केटीआर त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी करत होते, असा आरोप के कविता यांनी केला.  केटीआर हे पक्षाचे संस्थापक के चंद्रशेखर राव यांचे सख्खे भाऊ आहेत. "माझ्या माहितीशिवाय पक्ष कार्यालयात निवडणुका घेण्यात आल्या, ज्यामुळे कामगार कायद्यांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. पक्षात काम कसे चालले आहे यावर मी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यामुळे माझ्याविरुद्ध द्वेष होता," असेही के. कविता यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Telanganaतेलंगणा