शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ज्योतिरादित्य शिंदेंना थेट लढत देणार राहुल गांधी?, मैत्री ते राजकीय वैर...राजकारणाचे बदलते रंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 19:05 IST

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे एकेकाळी जवळचे मित्र होते.

भोपाळ- 

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे एकेकाळी जवळचे मित्र होते. इतके की काँग्रेसमध्ये असताना शिंदे हे राहुल यांच्या कोअर टीमचे महत्त्वाचे सदस्य होते. प्रियांका गांधीही त्यांना आपल्या भावाप्रमाणेच मानत होत्या. दोन पिढ्यांपासून दोन्ही कुटुंबातील ही मैत्री सुरू होती. शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे आणि राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांच्यातही घट्ट मैत्री होती. त्यानंतर मार्च २०२० साली ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या तीन वर्षांत राजकारणानं असं वळण घेतलं आहे की आता या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राहुल आणि ज्योतिरादित्य यांच्यात आमने-सामने लढत पाहायला मिळणार आहे.

राहुल गांधींचा ज्योतिरादित्य यांच्यावर हल्लातीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेल्यानंतरही, ज्योतिरादित्य यांनी गांधी कुटुंबावर थेट हल्ला करणं टाळलं. राहुल यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता ते काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा म्हणून खोडून काढायचे, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याचेच उदाहरण म्हणजे बुधवारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत राहुल यांच्यावर थेट हल्ला चढवला. राहुल यांना स्वार्थी राजकारणी म्हणण्याबरोबरच त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीला देशद्रोही असल्याचं म्हटलं.

भाजपाच्या रणनितीचा प्रमुख दुवा आहेत ज्योतिरादित्य शिंदेराहुल यांच्याबाबत ज्योतिरादित्य यांच्या आक्रमक भूमिकेचा संबंध या वर्षी मध्यप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशी आहे. राज्यात सत्ताविरोधी लढा देत असलेल्या भाजपला यंदाची लढत चुरशीची होणार असल्याची कल्पना आहे. समाजातील अनेक घटकांमध्ये विशेषत: तरुण वर्गात भाजपा सरकारबद्दल नाराजी आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपाही अस्वस्थ आहे. तरुणांच्या व्होट बँकेचा मोठा भाग काँग्रेसच्या बाजूने जाण्याची भीती आहे. हे पाहता भाजपा ज्योतिरादित्य यांचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर करू शकते.

राहुल यांच्या विरुद्ध ज्योतिरादित्य उभे ठाकणार?तीन राज्यांत मोडकळीस आलेली काँग्रेस पुन्हा मध्यप्रदेशात सत्तेत येण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, यात शंका नाही. निवडणूक प्रचारात राहुल गांधी महत्त्वाची भूमिका बजावणार हेही जवळपास निश्चित झाले आहे. मध्य प्रदेशात राहुल गांधींना टक्कर देण्यासाठी भाजपाकडे तरुण चेहरा नाही. दुसरीकडे, तरुणांमध्ये ज्योतिरादित्य यांची लोकप्रियताही सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चांगल्या कामगिरीचे श्रेयही मुख्यत्वे ज्योतिरादित्य यांनाच दिलं गेलं. १५ महिन्यांनंतर ते काँग्रेस सरकार पडण्याचे कारणही ठरले होते. अशा स्थितीत राहुलला टक्कर देण्यासाठी भाजपाकडून ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

ज्योतिरादित्यांसमोर बालेकिल्ला वाचवण्याचे आव्हानविधानसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतलेल्या काँग्रेसचे सर्वाधिक लक्ष ज्योतिरादित्य यांचा बालेकिल्ला असलेल्या ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशावर आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह या क्षेत्रात सातत्याने सक्रिय आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ हेही या भागाला सतत भेट देत आहेत. काँग्रेसची संपूर्ण रणनीती शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करण्याची आहे. जेणेकरून त्यांच्याकडून बदला घेतला जाऊ शकेल. अशा परिस्थितीत ज्योतिरादित्य यांच्यासमोर आपला बालेकिल्ला वाचवण्याचं आव्हान आहे. इच्छा असूनही ते या लढ्यापासून दूर राहू शकत नाहीत, अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. काँग्रेसशी मुकाबला करायचा असेल तर त्यांना स्वत:लाच पुढाकार घ्यावा लागेल आणि आपल्या जुन्या मित्राला सामोरं जाणं ही त्यांची मजबुरी असेल. त्यांची बुधवारी नवी दिल्लीत होणारी पत्रकार परिषद कदाचित या तयारीतील पहिली पायरी असू शकते.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेRahul Gandhiराहुल गांधी