शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

संपुआचे आर्थिक धोरण मूठभर लोकांच्याच हिताचे- जेटली फेरआढावा घेणार : हस्तक्षेपाची बाब गंभीर- जावडेकर

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नवी दिल्ली : यापूर्वीच्या संपुआ सरकारने काही मूठभर लोकांच्या भल्यासाठी भांडवलवादी तर उर्वरित लोकांसाठी पीडादायक असे आर्थिक धोरण अवलंबले होते. जयंती नटराजन यांनी राहुल गांधींवर केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांकडे नव्याने लक्ष घालण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : यापूर्वीच्या संपुआ सरकारने काही मूठभर लोकांच्या भल्यासाठी भांडवलवादी तर उर्वरित लोकांसाठी पीडादायक असे आर्थिक धोरण अवलंबले होते. जयंती नटराजन यांनी राहुल गांधींवर केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांकडे नव्याने लक्ष घालण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
संपुआ सरकारच्या काळात मंजुरी देण्यात आलेल्या किंवा नाकारण्यात आलेल्या प्रकल्पांचा फेरआढावा घेतला जावा. नटराजन यांनी केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांमध्ये वैधानिक किंवा नियमानुसार अपरिहार्यतेचा विचार केला गेलेला नाही. केवळ काँग्रेसचा आणि या पक्षाच्या नेत्यांचा विचार करूनच निर्णय घेतले गेले. केवळ कायदा आणि नियमानुसारच प्रकल्पांना मंजुरी द्यायला हवी, त्यासाठी पर्यावरण मंत्रालय मंजुरी देण्यात आलेल्या आणि नाकारण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांचा विचार करेल, अशी मला आशा आहे, असेही जेटलींनी नमूद केले.
----------------------------
फायलींचा फेरआढावा घेणार- जावडेकर
एखाद्या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी विशिष्ट प्रकारची विनंती केली जात असल्यास ती गंभीर बाब आहे. माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी बाह्य दबावाचा केलेला आरोप पहाता मी संबंधित फायलींचा फेरआढावा घेणार आहे, असे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. नटराजन यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्यावर हस्तक्षेपाचा केलेला आरोप गंभीर आहे. पर्यावरण मंत्री या नात्याने माझी बाह्य प्रभावाबद्दल आरोप असलेल्या विशिष्ट फायलींची पुन्हा आढावा घेण्याची जबाबदारीच आहे, असेही त्यांनी नमूद केले.