शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

न्यायाधीशांना ३० टक्के पगारवाढ; दोन वर्षाची थकबाकीही मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:41 IST

देशभरातील सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाने ३० टक्के पगारवाढ मंजूर केली असून, त्यांना दोन वर्षांच्या वाढीव पगाराची थकबाकीही देण्याचा आदेश दिला आहे.

नवी दिल्ली : देशभरातील सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाने ३० टक्के पगारवाढ मंजूर केली असून, त्यांना दोन वर्षांच्या वाढीव पगाराची थकबाकीही देण्याचा आदेश दिला आहे.केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर न्यायिक अधिकाºयांचे सुधारित वेतन व भत्ते ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने निवृत्त न्यायाधीश न्या. पी. व्यंकटराम रेड्डी व ज्येष्ठ वकील आर. बसंत यांची समिती नेमली होती.या समितीने अंतरिम पगारवाढीच्या संदर्भात दिलेला अहवाल न्या. जस्ती चेलमेश्वर व न्या. संजय कृष्ण कौल यांच्या खंडपीठाने मंजूर केला आणि सर्व राज्यांनी त्याची अंमलबजावणी करावी, असा आदेश दिला.त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, महानगर दंडाधिकारी सत्र न्यायाधीश, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश यासह सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायिक अधिकाºयांना १ जानेवारी २०१६ पासूने मूळ वेतनात ३० टक्के वाढ मिळेल. मात्र वाढीव वेतनावर त्यांना महागाईभत्ता मिळणार नाही.वाढीव दराने वेतन १ मे २०१८ पासून दिले जावे आणि वाढीव वेतनाची १ जानेवारी २०१६ पासूनची थकबाकी ३० जून २०१८ पर्यंत द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. निवृत्त न्यायिक अधिकाºयांना मिळणारे पेन्शन व दिवंगत न्यायिक अधिकाºयांच्या कुटुंबीयांना मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन यांतही ३० टक्के वाढ करण्यात आली असून, त्यांनाही दोन वर्षांची थकबाकी मिळेल.जी अंतिम पगारवाढ ठरेल, तिच्या अधीन राहून अंतरिम वेतनवाढ दिली जात आहे. ती अंतिम पगारवाढीत ‘अ‍ॅडजस्ट’ केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. महाराष्ट्रातही अंतरिम पगारवाढ लागू करूआणि अंतिम पगारवाढीचे जे आदेश दिले जातील त्याचेही पालन करू, असे आश्वासन राज्य सरकारने न्यायालयास दिले.नवी पेन्शन योजना रद्दराज्यातील न्यायाधीशांची रिकामी पदे, न्यायालयांमधील अपुºया सोयी-सुविधा व न्यायाधीशांचे पगार व पेन्शन यासंबंधी पुण्यातील एक सीए विहार दुर्वे यांची उच्च न्यायालयात केलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वत:कडे वर्ग केली होती. त्यातील पगाराचा मुद्दा वगळून इतर मुद्द्यांवर निर्णयासाठी याचिका पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठविली गेली.याच याचिकेत उच्च न्यायालयाने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाºयांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला होता. या पेन्शन योजनेसाठी न्यायिक अधिकाºयांच्या पगारातून दरमहा कापून घेतलेली १० टक्के रद्दक त्यांना व्याजासह परत करण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने दिला होता.याविरुद्ध राज्य सरकारने अपील केले होते. उच्च न्यायालयाचा निकाल रद्द न करता अपीलही निकाली काढले गेले. त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमलेल्या न्यायिक अधिकाºयांना नवी पेन्शन योजना नको असेल, त्यांना ती नाकारण्याचा पर्याय उपलब्ध होईल आणि त्यापोटी कापून घेतलेली रक्कम त्यांना परत मिळेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय