शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

न्यायाधीशांचे म्हणणे योग्य, पण... सर्वोच्च न्यायालयातील वकिलांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:31 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जे आरोप केले, ते पाहता सर्वोच्च न्यायालयाला कोणीतरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ध्वनित होत आहे. सर्वोच्च न्यायालय हे नियंत्रणमुक्तच असले पाहिजे. सरकारनेही असे प्रयत्न करण्यापासून लांब राहायला पाहिजे, असे मत प्रख्यात कायदेतज्ज्ञ राजीव धवन यांनी व्यक्त केले.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जे आरोप केले, ते पाहता सर्वोच्च न्यायालयाला कोणीतरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ध्वनित होत आहे. सर्वोच्च न्यायालय हे नियंत्रणमुक्तच असले पाहिजे. सरकारनेही असे प्रयत्न करण्यापासून लांब राहायला पाहिजे, असे मत प्रख्यात कायदेतज्ज्ञ राजीव धवन यांनी व्यक्त केले.माजी कायदामंत्री अश्विनी कुमार म्हणाले की, भारताच्या इतिहासातील हा दु:खद दिवस आहे. न्यायालयातील घटना सांगण्यासाठी न्यायाधीशांना बाहेर यावे लागले. सरन्यायाधीश प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक उपाय करतील, असा विश्वास मला आहे.ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ इंदिरा जयसिंह म्हणाल्या की, न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे घटनात्मक पेचप्रसंग उद्भवणार नाही. किंबहुना लोकशाही अधिक बळकट होईल. न्यायालयाच्या कारभारातील पारदर्शकता यामुळे वाढेल व जनतेचा न्याययंत्रणेवरील विश्वासही अधिक दृढ होईल. या न्यायाधीशांनी व्यवस्थेबद्दलचे आपले आक्षेप मांडले आहेत. ही व्यवस्था दुरुस्त करणे शक्य आहे.नामवंत कायदेतज्ज्ञ के. टी. तुलसी म्हणाले की, कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळेच या चार न्यायाधीशांची पत्रकार परिषद घेतली आहे. या न्यायाधीशांवर ही पाळी का आली याचाही विचार होणे आवश्यक आहे. अ‍ॅड. जयवीर शेरगिल म्हणाले की, न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाची विश्वासार्हता टिकून राहावी म्हणून आता योग्य पावले उचलली जायला हवीत. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी आशा सामान्य माणूस मनात बाळगून असतो. त्याच न्यायालयात असे प्रकार घडायला लागले तर मग विश्वासार्हतेच्या ठिकºया उडायला वेळ लागणार नाही.आज निघेल तोडगासर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणे योग्य नव्हते. त्यांनी पत्रकार परिषद घेणे टाळायला हवे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये जो वाद उत्पन्न झाला आहे त्यावर शनिवारपर्यंत नक्की तोडगा निघेल.- के. के. वेणुगोपाल, अ‍ॅटर्नी जनरलपद्धत चुकीचीन्यायाधीशांनी जे मुद्दे मांडले ते बरोबर आहेत. मात्र त्या मुद्द्यांचे निराकरण ज्या पद्धतीने व्हावे असे या न्यायाधीशांना वाटते ती पद्धत चुकीची आहे. प्रसारमाध्यमांसमोर जाण्याचा पत्करलेला मार्ग योग्य नाही. कुटुंबातील भांडणे रस्त्यावर आणण्याचे काहीही कारण नव्हते.- एन. संतोष हेगडे,माजी सॉलिसिटर जनरलमी उद्विग्न झालोयचार न्यायाधीशांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या घटनेने मी उद्विग्न झालो आहे. हे पाऊल टाळता आले असते. अशा गोष्टींचे न्याययंत्रणेवर विपरीत परिणाम होऊ शकतात.- सोली सोराबजी,माजी अ‍ॅटर्नी जनरल

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय