शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

न्यायाधीशांचे म्हणणे योग्य, पण... सर्वोच्च न्यायालयातील वकिलांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:31 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जे आरोप केले, ते पाहता सर्वोच्च न्यायालयाला कोणीतरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ध्वनित होत आहे. सर्वोच्च न्यायालय हे नियंत्रणमुक्तच असले पाहिजे. सरकारनेही असे प्रयत्न करण्यापासून लांब राहायला पाहिजे, असे मत प्रख्यात कायदेतज्ज्ञ राजीव धवन यांनी व्यक्त केले.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जे आरोप केले, ते पाहता सर्वोच्च न्यायालयाला कोणीतरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ध्वनित होत आहे. सर्वोच्च न्यायालय हे नियंत्रणमुक्तच असले पाहिजे. सरकारनेही असे प्रयत्न करण्यापासून लांब राहायला पाहिजे, असे मत प्रख्यात कायदेतज्ज्ञ राजीव धवन यांनी व्यक्त केले.माजी कायदामंत्री अश्विनी कुमार म्हणाले की, भारताच्या इतिहासातील हा दु:खद दिवस आहे. न्यायालयातील घटना सांगण्यासाठी न्यायाधीशांना बाहेर यावे लागले. सरन्यायाधीश प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक उपाय करतील, असा विश्वास मला आहे.ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ इंदिरा जयसिंह म्हणाल्या की, न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे घटनात्मक पेचप्रसंग उद्भवणार नाही. किंबहुना लोकशाही अधिक बळकट होईल. न्यायालयाच्या कारभारातील पारदर्शकता यामुळे वाढेल व जनतेचा न्याययंत्रणेवरील विश्वासही अधिक दृढ होईल. या न्यायाधीशांनी व्यवस्थेबद्दलचे आपले आक्षेप मांडले आहेत. ही व्यवस्था दुरुस्त करणे शक्य आहे.नामवंत कायदेतज्ज्ञ के. टी. तुलसी म्हणाले की, कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळेच या चार न्यायाधीशांची पत्रकार परिषद घेतली आहे. या न्यायाधीशांवर ही पाळी का आली याचाही विचार होणे आवश्यक आहे. अ‍ॅड. जयवीर शेरगिल म्हणाले की, न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाची विश्वासार्हता टिकून राहावी म्हणून आता योग्य पावले उचलली जायला हवीत. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी आशा सामान्य माणूस मनात बाळगून असतो. त्याच न्यायालयात असे प्रकार घडायला लागले तर मग विश्वासार्हतेच्या ठिकºया उडायला वेळ लागणार नाही.आज निघेल तोडगासर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणे योग्य नव्हते. त्यांनी पत्रकार परिषद घेणे टाळायला हवे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये जो वाद उत्पन्न झाला आहे त्यावर शनिवारपर्यंत नक्की तोडगा निघेल.- के. के. वेणुगोपाल, अ‍ॅटर्नी जनरलपद्धत चुकीचीन्यायाधीशांनी जे मुद्दे मांडले ते बरोबर आहेत. मात्र त्या मुद्द्यांचे निराकरण ज्या पद्धतीने व्हावे असे या न्यायाधीशांना वाटते ती पद्धत चुकीची आहे. प्रसारमाध्यमांसमोर जाण्याचा पत्करलेला मार्ग योग्य नाही. कुटुंबातील भांडणे रस्त्यावर आणण्याचे काहीही कारण नव्हते.- एन. संतोष हेगडे,माजी सॉलिसिटर जनरलमी उद्विग्न झालोयचार न्यायाधीशांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या घटनेने मी उद्विग्न झालो आहे. हे पाऊल टाळता आले असते. अशा गोष्टींचे न्याययंत्रणेवर विपरीत परिणाम होऊ शकतात.- सोली सोराबजी,माजी अ‍ॅटर्नी जनरल

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय