शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:02 IST

न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले.

बेगुसराय : सध्या बिहारच्या बेगुसरायमध्ये न्यायाधीश मंजु श्री यांची खूप चर्चा होत आहे. दरम्यान, महिला न्यायाधीश मंजू श्री यांनी वृत्तपत्रातील बातमी वाचून एका रुग्णाला मदत करून नवा आदर्श घालून दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उप-न्यायाधीश (वरिष्ठ श्रेणी) सह सचिव मंजू श्री, अचानक बेगुसरायच्या सदर हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाशी लढा देत असलेल्या रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचल्या. 

न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. दरम्यान, विजय कुमार नावाचा रुग्ण बेगुसराय सदर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे, रक्ताच्या कमतरतेमुळे तो आपल्या जीवाशी लढत आहे. न्यायाधीश मंजू श्री यांना या रूग्णाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सदर हॉस्पिटल गाठून सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद कुमार यांना चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर सदर रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडून २ युनिट रक्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

न्यायाधीश मंजू श्री यांनी सांगितले की, वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीत विजय कुमार नावाची व्यक्ती सदर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. रुग्णाच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण (२.५ ग्रॅम) फारच कमी आहे . त्यानंतर मी स्वत: सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रक्तपेढीच्या प्रभारी डॉ. पूनम सिंग यांनी आयसीयूमध्ये पोहोचून रुग्णाची प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी डॉक्टर हरिगोविंद रुग्णावर उपचार करत होते. यानंतर, सीएस यांना कोणत्याही परिस्थितीत रक्ताची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, महिला न्यायाधीशांच्या सूचनेनंतर रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णाला दोन युनिट रक्त देण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच, न्यायाधीश मंजुश्री यांच्या या पावलाची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे.

कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी काय सांगितले?वर्षभरापूर्वी काही रक्तविक्रेत्यांनी विजय यांना हाजीपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर नेले आणि त्यांच्या शरीरातून रक्त काढले. त्यानंतर विजय हे आजारी पडले आणि हळूहळू त्यांचा आजार वाढत गेला. आज ते आयसीयूमध्ये आयुष्याशी झुंज देत आहेत, असे कुटुंबीयांनी सांगितले. तर रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर हरिगोविंद यांनी सांगितले की, रक्तस्त्राव होत असल्याच्या तक्रारीवरून रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर बरीच सुधारणा झाली आहे, तो आला तेव्हा त्याच्या शरीरात फक्त २.५ ग्रॅम हिमोग्लोबिन होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलBiharबिहार