शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:02 IST

न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले.

बेगुसराय : सध्या बिहारच्या बेगुसरायमध्ये न्यायाधीश मंजु श्री यांची खूप चर्चा होत आहे. दरम्यान, महिला न्यायाधीश मंजू श्री यांनी वृत्तपत्रातील बातमी वाचून एका रुग्णाला मदत करून नवा आदर्श घालून दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उप-न्यायाधीश (वरिष्ठ श्रेणी) सह सचिव मंजू श्री, अचानक बेगुसरायच्या सदर हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाशी लढा देत असलेल्या रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचल्या. 

न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. दरम्यान, विजय कुमार नावाचा रुग्ण बेगुसराय सदर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे, रक्ताच्या कमतरतेमुळे तो आपल्या जीवाशी लढत आहे. न्यायाधीश मंजू श्री यांना या रूग्णाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सदर हॉस्पिटल गाठून सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद कुमार यांना चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर सदर रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडून २ युनिट रक्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

न्यायाधीश मंजू श्री यांनी सांगितले की, वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीत विजय कुमार नावाची व्यक्ती सदर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. रुग्णाच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण (२.५ ग्रॅम) फारच कमी आहे . त्यानंतर मी स्वत: सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रक्तपेढीच्या प्रभारी डॉ. पूनम सिंग यांनी आयसीयूमध्ये पोहोचून रुग्णाची प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी डॉक्टर हरिगोविंद रुग्णावर उपचार करत होते. यानंतर, सीएस यांना कोणत्याही परिस्थितीत रक्ताची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, महिला न्यायाधीशांच्या सूचनेनंतर रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णाला दोन युनिट रक्त देण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच, न्यायाधीश मंजुश्री यांच्या या पावलाची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे.

कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी काय सांगितले?वर्षभरापूर्वी काही रक्तविक्रेत्यांनी विजय यांना हाजीपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर नेले आणि त्यांच्या शरीरातून रक्त काढले. त्यानंतर विजय हे आजारी पडले आणि हळूहळू त्यांचा आजार वाढत गेला. आज ते आयसीयूमध्ये आयुष्याशी झुंज देत आहेत, असे कुटुंबीयांनी सांगितले. तर रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर हरिगोविंद यांनी सांगितले की, रक्तस्त्राव होत असल्याच्या तक्रारीवरून रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर बरीच सुधारणा झाली आहे, तो आला तेव्हा त्याच्या शरीरात फक्त २.५ ग्रॅम हिमोग्लोबिन होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलBiharबिहार