शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

न्यायाधीश निवड पद्धत बदलण्यास सरकार उत्सुक

By admin | Updated: July 25, 2014 02:04 IST

निवड मंडळाऐवजी (कॉलेजियम) नवीन पद्धत आणण्याच्या विधेयकाबद्दल रालोआ सरकारने राजकीय पक्षांचे मत जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नवी दिल्ली : न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या निवड मंडळाऐवजी (कॉलेजियम) नवीन पद्धत आणण्याच्या विधेयकाबद्दल रालोआ सरकारने राजकीय पक्षांचे मत जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वरिष्ठ न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कायदा बनविण्याच्या आवश्यकतेबद्दल प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्र लिहिले आहे.
आधीच्या संपुआ सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निवड मंडळाला भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एका न्यायाधीशाला मद्रास उच्च न्यायालयात मुदतवाढ देण्यास सांगिल्याचा पर्दापाश झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
वरिष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक करण्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवड मंडळाची शिफारस परत पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर सरकारचा हा निर्णय आला आहे.
न्यायिक नेमणूक आयोग स्थापन करण्यासाठी सरकार विविध राजकीय पक्ष आणि नामांकित कायदेपंडितांचे मत घेत आहे, असे प्रसाद यांनी 21 जुलैला सांगितले होते. सध्या निवड मंडळाची जागा नेमणूक आयोग घेणार आहे. मोदी सरकार आधीच्या संपुआ सरकारने आणलेल्या एका विधेयकात दुरुस्ती करून चालू विधेयक मांडण्याचा विचार करीत आहे. रालोआ सरकारला संपुआ सरकारच्या विधेयकात काही कच्चे दुवे आढळले आहेत. केंद्र सरकार यासंदर्भात विचारविनियम करण्यासाठी एक सर्वपक्षीय बैठक बोलविण्याचा विचार करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)