शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

दिवाळीदिवशीच हातात नोकरी! ७५ हजार तरुणांना दिली नियुक्तिपत्रे; दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 06:51 IST

Jobs : कोविड-१९ साथीनंतर अनेक देशांना भेडसावत असलेल्या आर्थिक संकटातून भारताला वाचविण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत आहे, असे मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : १० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोजगार मेळाव्या’चा प्रारंभ केला. पहिल्या टप्प्यात ७५ हजार युवकांना नोकरीची नियुक्तिपत्रेही त्यांनी यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वितरित केली. कोविड-१९ साथीनंतर अनेक देशांना भेडसावत असलेल्या आर्थिक संकटातून भारताला वाचविण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत आहे, असे मोदी यांनी सांगितले.

मेळाव्यास मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. हा मेळावा एक महत्त्वाचा मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले. तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्या देण्यासाठी सरकार आठ वर्षांपासून काम करीत असल्याचे नमूद केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये सरकारची विविध खाती आणि मंत्रालयांना आगामी दीड वर्षात १० लाख लोकांची भरती करण्याची सूचना केली होती.

कोणत्या विभागात दिल्या नोकऱ्या? ज्या ७५ हजार लोकांना मोदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली, ते भारत सरकारच्या ३८ मंत्रालये व विभागांत रुजू होतील. गट अ व ब (सनदी), गट ब (बिगर सनदी) आणि गट क अशा विविध पातळ्यांवर ते काम करतील. त्यांना केंद्रीय सशस्त्र दलांचे जवान, उपनिरीक्षक, हवालदार, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक आणि एमटी अशा विविध पदांवर घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यातील काहींना थेट मंत्रालये आणि विभागांनी भरती केले आहे. काहींच्या नियुक्त्या यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे भरती बोर्डामार्फत केल्या गेल्या आहेत.

रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक नाेकऱ्यापंतप्रधानांनी यावेळी देशातील तरुणांसाठी राेजगार मेळाव्याचे उद्घाटन करून लाखाे तरुणांसाठी एक दालन उघडले आहे. पुढील १४ महिन्यांमध्ये केंद्र सरकारच्या ३८ विभागांमधील १० लाख रिक्त पदांसाठी भरती हाेणार आहे. ही भरती काेणत्या स्तरांसाठी आणि काेणत्या खात्यात हाेणार आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया.     

कोविड-१९ साथीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नाही, ही वस्तुस्थिती आहे. कित्येक मोठ्या अर्थव्यवस्था संघर्ष करीत आहेत. कित्येक देशांत महागाई आणि बेरोजगारी शिखरावर आहे. शतकातून एखाद्या वेळी येणाऱ्या साथीचे परिणाम १०० दिवसांत जात नाहीत. या संकटापासून आपल्या देशाला वाचविण्यासाठी सरकार नवीन पुढाकार घेत आहे. हे आव्हानात्मक काम आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरी