शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

‘जेएनयू’ विद्यार्थ्यांचा संसदेवरील मोर्चा रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 01:47 IST

वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ तीन आठवड्यांपासून आंदोलन

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन सोमवारी संसद भवनाकडे आपला मोर्चा वळविला; पण पोलिसांनी त्यांना विद्यापीठ परिसराच्या आतच रोखले. वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ गत तीन आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे संसदेचे लक्ष वेधण्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. जोपर्यंत सरकार शुल्कवाढ मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे या विद्यार्थींनी स्पष्ट केले आहे.या विद्यार्थ्यांना शेकडो पोलिसांनी बाबा गंगनाथ मार्गावरच अडविले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे आल्यानंतर ६०० मीटर अंतरावर या विद्यार्थ्यांना रोखण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी जागेवरच रोखले.वसतिगृहाच्या नियमावलीविरुद्ध हे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. यात शुल्कवाढ, ड्रेस कोड आणि येण्या-जाण्याची वेळ याबाबत नियम आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष एन.साई बालाजी म्हणाले की, संसदेकडे शांततेत जाणारा हा मोर्चा पोलिसांनीरोखला.मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केली समितीजेएनयूमधील कार्यप्रणाली सुरळीत करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. एचआरडीचे सचिव आर. सुब्रह्मण्यम म्हणाले की, सर्वांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यातून जेएनयूचे कामकाज सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला सल्ला देण्यासाठी सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.यात यूजीसीचे माजी अध्यक्ष व्ही. एस. चौहान, एआयसीटीई अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे आणि यूजीसी सचिव रजनीश जैन यांचा समावेश आहे. ही समिती विद्यार्थी आणि प्रशासनसोबत तत्काळ चर्चा सुरू करेन.