शहरं
Join us  
Trending Stories
1
"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
3
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
4
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
5
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
6
Rohit Sharmaची पत्नी रितिकाच्या हातातल्या महागड्या पर्सची रंगली चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल
7
'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास
8
Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
9
Travel : एकटं फिरायचंय? टेन्शन सोडा! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी 'ही' ५ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट
10
"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
11
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
12
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
13
Harsha Richhariya : "आता बस्स झालं, तुमचा धर्म तुमच्याकडेच ठेवा, मी सीता नाही..."; हर्षा रिछारियाचा मोठा निर्णय
14
Nashik Municipal Election 2026 : बडगुजर-शहाणे यांच्या लढतीमुळे प्रभाग २९ 'हॉटस्पॉट'; काट्याच्या लढतीमुळे रंगत
15
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
16
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
18
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
19
महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
20
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
Daily Top 2Weekly Top 5

प्रख्यात कवी गुलझार, महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 05:16 IST

गुलझार यांच्या विविध चित्रपटांतील गीतांसह उर्दू साहित्याचा सन्मान; रामभद्राचार्यांच्या संस्कृत भाषेतील साहित्यकृतीचा होणार यथोचित गौरव

नवी दिल्ली : प्रख्यात उर्दू कवी, चित्रपट गीतकार, दिग्दर्शक अशा विविध पैलूंनी आपली झळाळती कारकीर्द घडविणारे गुलझार तसेच संस्कृतचे महापंडित, शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखक असलेले जगद्गुरू रामभद्राचार्य या दोन मान्यवरांना २०२३ च्या ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी ही घोषणा केली.

साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान

ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे की, २०२३च्या ज्ञानपीठ पुरस्कारांसाठी उर्दू व संस्कृत या भाषांतील दोन मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.

२०२२ साली ज्ञानपीठ पुरस्कार गोव्यातील लेखक दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात आला होता. मावजो यांनी कोकणी भाषेत साहित्यनिर्मिती केली. देशातील साहित्यक्षेत्रात ज्ञानपीठ हा सर्वोच्च सन्मान असल्याचे

मानण्यात येते.

पाच राष्ट्रीय पुरस्कार विजेते

nसाहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असे मानल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे २०२३ सालातील मानकरी असलेले गुलझार यांनी हिंदी चित्रपटांसाठीही मोठे योगदान दिले आहे. ‘आनंद’, ‘ओंकारा’, ‘खामोशी’, ‘थोडीसी बेवफाई’, ‘दो दूनी चार’, ‘बंटी और बबली’, अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत.

n‘धुआँ’ या कथासंग्रहासाठी २००२ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २००४ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ व २०१३ साली त्यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. तसेच चित्रपटसृष्टीतील कामगिरीसाठी त्यांना आजवर पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

तब्बल २२ भाषांवर प्रभुत्व

उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथील तुलसी पीठाचे संस्थापक व प्रमुख रामभद्राचार्य हे आध्यात्मिक गुरू आहेत. संस्कृतचे महापंडित असलेल्या रामभद्राचार्य यांनी १००हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ते रामानंद संप्रदायाचे आहेत.

विशेष म्हणजे २२ भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहेत. चित्रकूट येथील जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे ते संस्थापक व आजीवन कुलपतीदेखील आहेत. २०२३ सालासाठीच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे तेही मानकरी ठरले आहेत.