शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

जमीन घोटाळा करून राज्याला लुटले, उपमुख्यमंत्र्यांचा हुड्डांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 16:21 IST

दुष्यंत चौटाला यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

सिरसा : हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दुष्यंत चौटाला हे जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) अध्यक्ष आहेत. हरयाणामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दुष्यंत चौटाला यांनी आपल्या पार्टीचा पाठिंबा भाजपाला दिल्यामुळे भूपिंदर सिंह हुड्डा यांनी त्यांचावर निशाणा साधला होता. मात्र, याला प्रत्युत्तर देताना दुष्यंत चौटाला यांनी भूपिंदर सिंह हुड्डा मुख्यमंत्री असताना सीएलयू (चेंज ऑफ लँड यूज) च्या नावावर घोटाळा करून राज्याला लुटले, अशा शब्दात पलटवार केला आहे. 

दुष्यंत चौटाला यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी दुष्यंत चौटाला म्हणाले, "निवडणुकीत आम्ही भाजपाच्या बाजूने किंवा काँग्रेसच्या बाजूने मते मागितली नाहीत. आम्ही भाजपासोबत किंवा काँग्रेससोबत निवडणूक लढलो नाही. 18 लाख 60 हजार मतांनी जनतेने जननायक जनता पार्टीचे 10 आमदार निवडून दिले आहेत. आम्हाला जनतेचे हित पाहून निर्णय घ्याला लागेल. हरयाणामधील स्थीर सरकारसाठी आपल्याला पाऊल टाकणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही योग्य निर्णय घेतला."

याचबरोबर, ज्यावेळी भूपिंदर सिंह हुड्डा सरकारमध्ये होते. त्यावेळी सीएलयू (चेंज ऑफ लँड यूज) च्या नावावर घोटाळा केले आणि राज्याला लुटले, अशा शब्दांत भूपिंदर सिंह हुड्डा यांच्यावर दुष्यंत चौटाला यांनी टीका केली. 

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले. त्यामुळे भाजपाने जेजेपीचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी काल शपथविधी सोहळा पार पडला. या शपविधी सोहळ्याला भूपिंदर सिंह हुड्डा सुद्धा उपस्थित होते. यावेळी भूपिंदर सिंह हुड्डा यांनी भाजपाला जेजेपीने दिलेला पाठिंबा म्हणजे मतदारांनी दिलेल्या कौलाचा अपमान असल्याचे सांगत जेजेपीबाबत नाराजी व्यक्त केली.

भूपिंदर सिंह हुड्डा म्हणाले होते की, "ही युती म्हणजे मतदान कोणाचे तरी आणि पाठिंबा कोणाला तरी या आधारावर बनली आहे. हे सरकार स्वार्थावर आधारित आहे. जेजेपीने जनतेच्या कौलाचा अपमान केला आहे. आमच्या पार्टीत झालेल्या बदलांमुळे आमच्याकडे कमी कालावधी होता. जर हे बदल आधीच झाले असते तर याचा परिणाम यापेक्षा वेगळा असता."

दरम्यान, मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ  घेतली आहे. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर काल राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मनोहरलाल खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.  

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकHaryanaहरयाणा