शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

वराठी गावातील जेट्टीची दुरवस्था; उधाणाचे पाणी आल्यास अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 23:55 IST

तडे गेलेल्या या जेटीकडे लक्ष देण्यास सागरी विकास विभागाला वेळ नसल्याने दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड खाडीपट्टा विभागात सावित्री नदीमध्ये अनेक गावांत महाराष्ट्र सागरी विकास विभागाकडून छोट्या जेट्टी बांधण्यात आल्या आहेत. या जेट्टी बांधताना कामे निकृष्ट पद्धतीने होत असल्याने अल्पावधीतच त्या नादुरु स्त होत आहेत, अशाच प्रकारे वराठी गावात बांधलेली जेट्टीदेखील दोन वर्षांतच तुटली आहे. तडे गेलेल्या या जेटीकडे लक्ष देण्यास सागरी विकास विभागाला वेळ नसल्याने दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.महाड तालुक्यात सावित्रीलगत असलेल्या खाडीपट्टा विभागातील गावांमधून स्थानिक ग्रामस्थ या खाडीवर व्यवसाय करून गुजराण करतात. यामध्ये वाळू उत्खनन, मासेमारी यांचा समावेश आहे, याकरिता महाराष्ट्र बंदर विकास विभागाने छोट्या जेट्टी बांधून दिल्या आहेत. यामध्ये वराठी, जुई, सव, तेलंगे, गोठे, दासगाव, या गावांचा समावेश आहे. पूर्वी बाणकोट खाडीतून सुटणाऱ्या बोटी वराठी, दासगाव या ठिकाणी थांबत असत. दासगाव प्रमाणेच वराठी हेदेखील एक बंदर होते. ग्रामस्थ छोट्या होड्यातून सावित्रीत मासेमारी करतात, तर अनेक जण वाळू व्यवसायही करतात. पिढ्यान्पिढ्याच्या व्यवसायाला प्रदूषणामुळे अवकळा लागली आहे.प्रदूषित पाण्याने मासेमारीचे प्रमाण कमी झाली आहे, असे असले तरी आजही अनेक जण कुटुंबासाठी मासेमारी करतात, याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळाने सावित्री खाडीलगत छोट्या जेट्टी बांधून दिल्या आहेत. यापैकीच वराठी गावातदेखील जेट्टी बांधण्यात आली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी ही जेट्टी बांधल्याचे येथील ग्रामस्थ नीलेश लोखंडे यांनी सांगितले. मात्र, निकृष्ट बांधकामामुळे ही जेट्टी अवघ्या दोन वर्षांतच तुटली आहे. यामुळे या जेट्टीवरून चालताना धोका निर्माण झाला आहे.- वराठी गावात महाराष्ट्र सागरी मंडळाने बांधलेल्या या जेट्टीला मधोमध भला मोठा तडा गेला आहे, यामुळे ही जेट्टी केव्हाही कोसळू शकते. या जेट्टीवरून चालताना तडा गेलेल्या जागेतून पाय अडकून पडण्याचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.- उधाणाचे पाणी जेट्टीवर पाणी असल्यास जेट्टीला पडलेल्या चिरा दिसून येत नाहीत, यामुळे स्थानिकांना अपघात होण्याची शक्यता आहे. या बाबत सागरी मंडळाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.पूर्वीच्या जलवाहतुकीच्या मार्गावरच वराठी या बंदरात सागरी मंडळाने दोन वर्षांपूर्वी जेट्टी बांधली होती. निकृष्ट कामामुळेच या जेट्टीची अल्पावधीतच दुरवस्था झाली होती. जेट्टीला पडलेल्या भेगांमुळे स्थानिक ग्रामस्थांना ये-जा करणे धोक्याचे बनले आहे.- नीलेश लोखंडे, वराठी ग्रामस्थ

टॅग्स :Raigadरायगड