शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

ओवैसींच्या हृदयात जिन्नाचा जिन्न, देश तोडू इच्छितात - गिरिराज सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 13:42 IST

अयोध्या वादात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींच्या हृदयात जिन्ना यांचा जिन्न आहे.

नवी दिल्ली- अयोध्या वादात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींच्या हृदयात जिन्ना यांचा जिन्न आहे. त्यामुळेच ते देश तोडू इच्छितात, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत. काल ओवैसींनी बाबरी मशिद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल, असं विधान केलं होतं.ओवैसी यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं होतं. त्यावेळी त्यांनी बाबरी मशिदीवर मुस्लिमांचा हक्क असल्याचा दावा केला होता. राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिमांच्या बाजूनेच लागले आणि त्यानंतर उद्ध्वस्त झालेली बाबरी मशीद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल, असा विश्वास ‘ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन’चे (एआयएमआयएम) प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला होता.ओवैसी म्हणाले होते की, आमची मशीद तेथे आहे, होती व तेथेच राहील. सर्वोच्च न्यायालय आमच्या हाती निकाल देईल तेव्हा मशीद पुन्हा होती तिथेच बांधली जाईल. सर्वोच्च न्यायालय श्रद्धेच्या आधारे नव्हे तर पुराव्यांच्या आधारावरच निर्णय देईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कोणाचेही नाव न घेता ओवैसी असेही म्हणाले होते की, हे लोक आम्हाला भीती घालत आहेत. आमच्या शरियतविरुद्ध ओरड करत आहेत. मशिद सोडून द्या, असे आम्हाला सांगत आहेत. पण काही झाले तरी आम्ही मशिद सोडणार नाही.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAyodhyaअयोध्या