शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींना टीव्हीवर दाखवण्यासाठी उद्योगपती देतात पैसे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 17:39 IST

राहुल गांधी हजारीबाग येथील बड़कागांवच्या प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी मोदींवर टीका केली.

झारखंड: झारखंडमध्ये एकूण पाच टप्प्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून, अजूनही तीन टप्पे बाकी आहे. तर याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंडमध्ये प्रचारसभेतून काँग्रेस नेते राहुल गांधीनी सोमवारी भाजपवर निशाणा साधला. केंद्रात 10-15 उद्योगपतींच सरकार आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानी यांच्या गळाभेटी घेतात. तसेच मोदींना टीव्हीवर दाखवण्यासाठी उद्योगपतींकडून पैसा दिला जात असल्याचे आरोप सुद्धा राहुल गांधींनी केले.

राहुल गांधी हजारीबाग येथील बड़कागांवच्या प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी मोदींवर टीका केली. मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. रोजगार मिळाला का? मेक इन इंडिया पूर्ण झाले. असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. कारखाने बंद होत आहेत. बेरोजगार तरुण एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जात आहेत. भाजपाचे लोक जेथे जेथे जातात तेथे लोकांना घाबरवतात. देशात एक द्वेषाचं वातवरण निर्माण झालं असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

तर केंद्रातील सरकार मोदी नव्हे तर 10-15 उद्योगपती चालवत आहे. मात्र आपले पंतप्रधान हे अदानी-अंबानी यांच्या गळाभेटी घेण्यात व्यस्त आहे. तसेच टीव्हीवर नेहमी दिसणारे पंतप्रधान फुकट दिसत नसून, त्यासाठी उद्योगपती पैसे देत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा यावेळी राहुल गांधीनी मोदींवर केला.

झारखंडमध्ये तिसऱ्या टप्यात 17 जागांवर मतदान होणार आहे. एकूण पाच टप्प्यात मतदान होणाऱ्या झारखंडमध्ये आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण झाले आहे. तर 20 डिसेंबरला शेवटच्या टप्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुद्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.