शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'मोदींना टीव्हीवर दाखवण्यासाठी उद्योगपती देतात पैसे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 17:39 IST

राहुल गांधी हजारीबाग येथील बड़कागांवच्या प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी मोदींवर टीका केली.

झारखंड: झारखंडमध्ये एकूण पाच टप्प्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून, अजूनही तीन टप्पे बाकी आहे. तर याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंडमध्ये प्रचारसभेतून काँग्रेस नेते राहुल गांधीनी सोमवारी भाजपवर निशाणा साधला. केंद्रात 10-15 उद्योगपतींच सरकार आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानी यांच्या गळाभेटी घेतात. तसेच मोदींना टीव्हीवर दाखवण्यासाठी उद्योगपतींकडून पैसा दिला जात असल्याचे आरोप सुद्धा राहुल गांधींनी केले.

राहुल गांधी हजारीबाग येथील बड़कागांवच्या प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी मोदींवर टीका केली. मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. रोजगार मिळाला का? मेक इन इंडिया पूर्ण झाले. असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. कारखाने बंद होत आहेत. बेरोजगार तरुण एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जात आहेत. भाजपाचे लोक जेथे जेथे जातात तेथे लोकांना घाबरवतात. देशात एक द्वेषाचं वातवरण निर्माण झालं असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

तर केंद्रातील सरकार मोदी नव्हे तर 10-15 उद्योगपती चालवत आहे. मात्र आपले पंतप्रधान हे अदानी-अंबानी यांच्या गळाभेटी घेण्यात व्यस्त आहे. तसेच टीव्हीवर नेहमी दिसणारे पंतप्रधान फुकट दिसत नसून, त्यासाठी उद्योगपती पैसे देत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा यावेळी राहुल गांधीनी मोदींवर केला.

झारखंडमध्ये तिसऱ्या टप्यात 17 जागांवर मतदान होणार आहे. एकूण पाच टप्प्यात मतदान होणाऱ्या झारखंडमध्ये आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण झाले आहे. तर 20 डिसेंबरला शेवटच्या टप्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुद्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.