शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

झारखंडच्या भूकबळीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:17 IST

आधार क्रमांकाशी जोडली न गेल्याने रेशन कार्डे रद्द करण्यात आली व धान्य मिळणे बंद झाल्याने झारखंडमध्ये भूकबळी गेले

नवी दिल्ली : आधार क्रमांकाशी जोडली न गेल्याने रेशन कार्डे रद्द करण्यात आली व धान्य मिळणे बंद झाल्याने झारखंडमध्ये भूकबळी गेले, असा दावा करणारी याचिका सुनावणीसाठी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे.सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस जारी केलेली नाही. मात्र, या याचिकेची एक प्रत केंद्र सरकारच्या वकिलाला द्यावी, असे न्यायालयाने याचिकादाराचे वकील कॉलिन घोन्साल्विस यांना सांगितले आहे. ही याचिका दोन आठवड्यानंतर सुनावणीसाठी येईल. अ‍ॅड. घोन्साल्विस यांनी सांगितले की, झारखंडमध्ये भूकबळी गेले त्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारने भरपाई द्यायला हवी.अकरा वर्षांच्या संतोषी नावाच्या मुलीची आई व बहिणीने कॉलिन घोन्साल्विस यांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखलकेली आहे. आधार क्रमांकाशी रेशन कार्ड जोडलेले नसल्याने झारखंडमधील गरीब दलित कुटुंबांना रेशनवर धान्य मिळत नाही. त्यामुळे त्यांना उपासमारी सहन करावी लागत आहे. त्यातूनच भूकबळीची प्रकरणे घडत आहेत. रेशन यंत्रणेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २००२साली एक महत्त्वाचा निकाल दिला होता. रेशनवर धान्य नाकारून अधिकाऱ्यांनी या निकालाचेही उल्लंघन केले आहे. त्यामुळे या अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत आहे. आधारची योजनेच्या वैधतेला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलेले नाही, हे कॉलिन घोन्साल्विस यांनी स्पष्ट केले.

ही याचिका करणा-यांकडे सर्व कागदपत्रे आहेत, पण त्यांचे रेशन कार्ड आधार क्रमांकाशी जोडले गेलेले नाही. त्यामुळे ते रद्द करण्यात आले. नवे रेशन कार्ड आधारशी जोडले असले, तरी या कुटुंबाला मार्च २०१७ पासून रेशनवर धान्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांची मुलगी संतोषी सप्टेंबरमध्ये भूकबळी झाली, असा कुटुंबीयांचा दावा झारखंड सरकारने अमान्य केला होता. संतोषीचा मृत्यू आजारपणाने झाला, असे सरकारचे म्हणणे आहे. झारखंडप्रमाणेच कर्नाटक व उत्तर प्रदेशातही भूकबळी गेल्याचा दावा याचिकेत आहेत.