शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

झारखंडच्या भूकबळीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:17 IST

आधार क्रमांकाशी जोडली न गेल्याने रेशन कार्डे रद्द करण्यात आली व धान्य मिळणे बंद झाल्याने झारखंडमध्ये भूकबळी गेले

नवी दिल्ली : आधार क्रमांकाशी जोडली न गेल्याने रेशन कार्डे रद्द करण्यात आली व धान्य मिळणे बंद झाल्याने झारखंडमध्ये भूकबळी गेले, असा दावा करणारी याचिका सुनावणीसाठी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे.सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस जारी केलेली नाही. मात्र, या याचिकेची एक प्रत केंद्र सरकारच्या वकिलाला द्यावी, असे न्यायालयाने याचिकादाराचे वकील कॉलिन घोन्साल्विस यांना सांगितले आहे. ही याचिका दोन आठवड्यानंतर सुनावणीसाठी येईल. अ‍ॅड. घोन्साल्विस यांनी सांगितले की, झारखंडमध्ये भूकबळी गेले त्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारने भरपाई द्यायला हवी.अकरा वर्षांच्या संतोषी नावाच्या मुलीची आई व बहिणीने कॉलिन घोन्साल्विस यांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखलकेली आहे. आधार क्रमांकाशी रेशन कार्ड जोडलेले नसल्याने झारखंडमधील गरीब दलित कुटुंबांना रेशनवर धान्य मिळत नाही. त्यामुळे त्यांना उपासमारी सहन करावी लागत आहे. त्यातूनच भूकबळीची प्रकरणे घडत आहेत. रेशन यंत्रणेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २००२साली एक महत्त्वाचा निकाल दिला होता. रेशनवर धान्य नाकारून अधिकाऱ्यांनी या निकालाचेही उल्लंघन केले आहे. त्यामुळे या अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत आहे. आधारची योजनेच्या वैधतेला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलेले नाही, हे कॉलिन घोन्साल्विस यांनी स्पष्ट केले.

ही याचिका करणा-यांकडे सर्व कागदपत्रे आहेत, पण त्यांचे रेशन कार्ड आधार क्रमांकाशी जोडले गेलेले नाही. त्यामुळे ते रद्द करण्यात आले. नवे रेशन कार्ड आधारशी जोडले असले, तरी या कुटुंबाला मार्च २०१७ पासून रेशनवर धान्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांची मुलगी संतोषी सप्टेंबरमध्ये भूकबळी झाली, असा कुटुंबीयांचा दावा झारखंड सरकारने अमान्य केला होता. संतोषीचा मृत्यू आजारपणाने झाला, असे सरकारचे म्हणणे आहे. झारखंडप्रमाणेच कर्नाटक व उत्तर प्रदेशातही भूकबळी गेल्याचा दावा याचिकेत आहेत.