शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

जेठमलानींना बदडून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:22 IST

नवी दिल्ली : १९८९ सालच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे १९७ जागा मिळाल्या होत्या. पण राजीव ...

नवी दिल्ली : १९८९ सालच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे १९७ जागा मिळाल्या होत्या. पण राजीव गांधी यांनी आम्ही सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका घेतली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जनता दलाला १४३ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला ८५. दुसºया क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी जनता दलाने सरकार स्थापनेचा दावा केला. चंद्रशेखर जनता दलाचे अध्यक्ष होते. पंतप्रधानपदासाठी व्ही. पी. सिंग यांचे नाव सर्वात पुढे होते. पण चंद्रशेखर हेही शर्यतीत होते. त्यांनी माघार घ्यावी, असे प्रयत्न अनेक नेते करीत होते.

अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी चंद्रशेखर यांच्या साऊ थ अ‍ॅव्हेन्यूतील घराबाहेर धरणे धरले. चंद्रशेखर यांनी माघार घ्यावी, अशी त्यांचीही मागणी होती. पण चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी तिथे जेठमलानी यांना बदडूनच काढले. ते कळताच जनता दलाचे काही नेते तिथे आले. त्यांनी जेठमलानी यांना तेथून दूर नेले. जनता दलाच्या बैठकीत व्ही. पी. सिंग यांच्या नेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवताच, सिंग सरकारचा पाठिंबा भाजपने पाठिंबा काढून घेतला. मग चंद्रशेखर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपद भूषविले. काँग्रेसने काही महिन्यांतच त्यांचा पाठिंबा काढून घेतला.