शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

जेठमलानींना बदडून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:22 IST

नवी दिल्ली : १९८९ सालच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे १९७ जागा मिळाल्या होत्या. पण राजीव ...

नवी दिल्ली : १९८९ सालच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे १९७ जागा मिळाल्या होत्या. पण राजीव गांधी यांनी आम्ही सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका घेतली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जनता दलाला १४३ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला ८५. दुसºया क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी जनता दलाने सरकार स्थापनेचा दावा केला. चंद्रशेखर जनता दलाचे अध्यक्ष होते. पंतप्रधानपदासाठी व्ही. पी. सिंग यांचे नाव सर्वात पुढे होते. पण चंद्रशेखर हेही शर्यतीत होते. त्यांनी माघार घ्यावी, असे प्रयत्न अनेक नेते करीत होते.

अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी चंद्रशेखर यांच्या साऊ थ अ‍ॅव्हेन्यूतील घराबाहेर धरणे धरले. चंद्रशेखर यांनी माघार घ्यावी, अशी त्यांचीही मागणी होती. पण चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी तिथे जेठमलानी यांना बदडूनच काढले. ते कळताच जनता दलाचे काही नेते तिथे आले. त्यांनी जेठमलानी यांना तेथून दूर नेले. जनता दलाच्या बैठकीत व्ही. पी. सिंग यांच्या नेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवताच, सिंग सरकारचा पाठिंबा भाजपने पाठिंबा काढून घेतला. मग चंद्रशेखर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपद भूषविले. काँग्रेसने काही महिन्यांतच त्यांचा पाठिंबा काढून घेतला.