शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जयललितांना तुरुंगवास

By admin | Updated: September 28, 2014 03:30 IST

16 वर्षापूर्वीच्या एका भ्रष्टाचार खटल्यात दोषी ठरून चार वर्षाचा कारावास भोगण्यासाठी तुरुंगात रवानगी झाल्याने अण्णा द्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार आहे.

भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी : चार वर्षे कारावास, 1क्क् कोटींचा दंड
बंगळुरू/चेन्नई : 16 वर्षापूर्वीच्या एका भ्रष्टाचार खटल्यात दोषी ठरून चार वर्षाचा कारावास भोगण्यासाठी तुरुंगात रवानगी झाल्याने अण्णा द्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार आहे. विधानसभेत भक्कम पाठबळ असूनही सत्तेवरून जाण्याची नामुश्की जयललितांवर आली आहे. 1क्क् कोटींचा दंडही त्यांना ठोठावला आहे. तसेच 6 वर्षाची अपात्रताही लागू होणार असल्याने पुढील विधानसभा निवडणूकही जयललिता लढवू शकणार नाहीत. 1996मध्ये मुख्यमंत्रिपदाची पहिली कारकिर्द संपल्यानंतर लगेचच कट्टर शत्रू असलेल्या द्रमुक सरकारने दाखल केलेल्या 6क्.65 कोटी रुपयांची अपसंपदा जमा केल्याच्या खटल्यात बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने जयललिता यांना चार वर्षाचा तुरुंगवास व तब्बल 1क्क् कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. (वृत्तसंस्था)
 
कडक पोलीस बंदोबस्तात न्यायाधीश जॉन मायकेल डिकुन्हा यांनी हा निकाल सुनावताच जयललिता यांना छातीत दुखून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आधी इस्पितळात नेऊन नंतर बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. 
 
नामुश्कीत पहिला नंबर
च्मुख्यमंत्रिपदावर असताना भ्रष्टाचार खटल्यात दोषी ठरून तुरुंगात जाण्याच्या नामुश्कीत जयललिता यांनी पहिला नंबर पटकावला आहे. 100 कोटी रुपयांचा दंड झालेल्या त्या पहिल्याच राजकीय नेत्या आहेत. 
च्दोषी ठरल्यावर लोकप्रतिनिधीचे पद लगेच जाईल या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा फटका बसलेल्या पहिल्या नेत्या. 
च्जयललिता यांच्या निकटस्थ सहकारी शशिकला आणि शशिकला यांचा भाचा सुधाकरन व भाची इलावरासी यांनाही न्यायालयाने चार वर्षाच्या कारावासाची व प्रत्येकी 10 कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
 
3 वर्षाहून जास्त शिक्षा झाल्याने जयललिता यांनी जामिनासाठी अर्ज केला नाही किंवा शिक्षेला स्थगितीही मागितली नाही, कारण न्यायाधीशांना तो अधिकारच नव्हता. 
 
आता कर्नाटक उच्च न्यायालयात शिक्षेला नव्हे, तर दोषित्वालाही स्थगिती मिळविण्यात यश मिळाले तरच जयललिता यांचे मुख्यमंत्रिपद टिकण्याची शक्यता आहे. जयललितांनंतर मुख्यमंत्रिपदी कोण, हा प्रश्नच आहे.  
 
निकाल जाहीर होताच त्याचे तीव्र पडसाद तामिळनाडूत उमटले व अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक व बस पेटविणो असे प्रकार घडले. द्रमुक नेते एम. करुणानिधी व हे प्रकरण लावून धरणारे भाजपाचे नेते डॉ. सुब्रrाण्यम स्वामी यांचे पुतळे संतप्त जमावाने जाळले.