शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'हॉस्पिटलमध्ये जयललितांना भेटण्याची कोणालाच परवानगी नव्हती, आम्ही त्यांच्या तब्बेतीची खोटी माहिती दिली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 19:03 IST

अण्णाद्रुमूकच्या मंत्र्यांनी जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या तब्बेतीची चुकीची माहिती देत जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावा श्रीनिवासन यांनी केला आहे

ठळक मुद्दे जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या तब्बेतीची चुकीची माहिती देत जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावातामिळनाडूचे वनमंत्री श्रीनिवासन यांनी जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावा केला आहेजयललिता यांच्याबद्दल खोटी माहिती दिली म्हणून जनतेची माफीही मागितली

चेन्नई - तामिळनाडूचे वनमंत्री श्रीनिवासन यांनी अण्णाद्रुमूकच्या सर्वेसर्वा आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूसंबंधी धक्कादायक माहिती उघड केली आहे. अण्णाद्रुमूकच्या मंत्र्यांनी जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या तब्बेतीची चुकीची माहिती देत जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावा श्रीनिवासन यांनी केला आहे. 5 डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांनी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. २२ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 75 दिवसांचा त्यांचा लढा अपयशी ठरला आणि अखेर त्यांचं निधन झालं. 

'जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांना भेटण्याची परवानगी कोणालाही नव्हती. नेमकं काय चालू आहे आणि तथ्य काय आहे याबद्दल कोणाला माहित नव्हतं. त्या इडली खात असल्याचा आमचा दावाही सपशेल खोटा होता', असं श्रीनिवासन यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी सार्वजनिक सभेला संबोधित करत असताना श्रीनिवासन यांनी हा खुलासा केला. यावेळी त्यांनी जयललिता यांच्याबद्दल खोटी माहिती दिली म्हणून जनतेची माफीही मागितली. 

'अनेक नेत्यांनी जयललितांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली होती. मात्र सर्वांना पहिल्या माळ्यावरच थांबवण्यात आलं होतं. त्यापुढे जाण्याची परवानगी कोणालाच देण्यात आली नव्हती. आम्हाला खुर्ची किंवा जमिनीवर बसवलं जायचं. पण कोणीही अम्मांना भेटलं नाही', अशी माहिती श्रीनिवासन यांनी दिली आहे. 

राज्यपाल सी विद्यासागर राव आणि इतर मान्यवरांनाही जयललिता यांच्या रुममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. 'पक्षाचं गुपित बाहेर पडू नये यासाठी आम्ही खोटं बोललो', असं श्रीनिवासन बोलले आहेत. 

एका आठवड्यापुर्वी श्रीनिवासन यांनी शशिकला आणि त्यांच्या कुटुंबावर जयललितांच्या उपचाराबद्दल गुप्तता राखल्याचा आरोप केला होता. जयललिता यांच्या मृत्यूला शशिकला आणि त्यांचं कुटुंब जबाबदार असल्याचा आरोपही श्रीनिवासन यांनी केला होता. 'रुग्णालयात असताना शशिकला आणि त्यांच्या कुटुंबाने एकालाही अम्मांजवळ जाऊ दिलं नाही. जयललिता यांचा मृत्यू कसा झाला हे फक्त त्यांनाच माहित आहे', असा आरोप श्रीनिवासन यांनी केला आहे.