शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

'हॉस्पिटलमध्ये जयललितांना भेटण्याची कोणालाच परवानगी नव्हती, आम्ही त्यांच्या तब्बेतीची खोटी माहिती दिली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 19:03 IST

अण्णाद्रुमूकच्या मंत्र्यांनी जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या तब्बेतीची चुकीची माहिती देत जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावा श्रीनिवासन यांनी केला आहे

ठळक मुद्दे जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या तब्बेतीची चुकीची माहिती देत जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावातामिळनाडूचे वनमंत्री श्रीनिवासन यांनी जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावा केला आहेजयललिता यांच्याबद्दल खोटी माहिती दिली म्हणून जनतेची माफीही मागितली

चेन्नई - तामिळनाडूचे वनमंत्री श्रीनिवासन यांनी अण्णाद्रुमूकच्या सर्वेसर्वा आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूसंबंधी धक्कादायक माहिती उघड केली आहे. अण्णाद्रुमूकच्या मंत्र्यांनी जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या तब्बेतीची चुकीची माहिती देत जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावा श्रीनिवासन यांनी केला आहे. 5 डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांनी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. २२ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 75 दिवसांचा त्यांचा लढा अपयशी ठरला आणि अखेर त्यांचं निधन झालं. 

'जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांना भेटण्याची परवानगी कोणालाही नव्हती. नेमकं काय चालू आहे आणि तथ्य काय आहे याबद्दल कोणाला माहित नव्हतं. त्या इडली खात असल्याचा आमचा दावाही सपशेल खोटा होता', असं श्रीनिवासन यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी सार्वजनिक सभेला संबोधित करत असताना श्रीनिवासन यांनी हा खुलासा केला. यावेळी त्यांनी जयललिता यांच्याबद्दल खोटी माहिती दिली म्हणून जनतेची माफीही मागितली. 

'अनेक नेत्यांनी जयललितांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली होती. मात्र सर्वांना पहिल्या माळ्यावरच थांबवण्यात आलं होतं. त्यापुढे जाण्याची परवानगी कोणालाच देण्यात आली नव्हती. आम्हाला खुर्ची किंवा जमिनीवर बसवलं जायचं. पण कोणीही अम्मांना भेटलं नाही', अशी माहिती श्रीनिवासन यांनी दिली आहे. 

राज्यपाल सी विद्यासागर राव आणि इतर मान्यवरांनाही जयललिता यांच्या रुममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. 'पक्षाचं गुपित बाहेर पडू नये यासाठी आम्ही खोटं बोललो', असं श्रीनिवासन बोलले आहेत. 

एका आठवड्यापुर्वी श्रीनिवासन यांनी शशिकला आणि त्यांच्या कुटुंबावर जयललितांच्या उपचाराबद्दल गुप्तता राखल्याचा आरोप केला होता. जयललिता यांच्या मृत्यूला शशिकला आणि त्यांचं कुटुंब जबाबदार असल्याचा आरोपही श्रीनिवासन यांनी केला होता. 'रुग्णालयात असताना शशिकला आणि त्यांच्या कुटुंबाने एकालाही अम्मांजवळ जाऊ दिलं नाही. जयललिता यांचा मृत्यू कसा झाला हे फक्त त्यांनाच माहित आहे', असा आरोप श्रीनिवासन यांनी केला आहे.