शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

'जय श्रीराम' म्हटल्यानं नितीशकुमारांच्या मंत्र्याविरोधात फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 15:01 IST

बिहार विधानसभेच्या आवारात 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्यामुळे नितीशकुमार यांच्या मंत्रीमंडळातील खुर्शीद ऊर्फ फिरोज अहमद यांच्या विरोधात फतवा जारी केला आहे

ठळक मुद्देखुर्शीद यांनी अलीकडेच विधानसभेच्या आवारात 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या होत्याखुर्शीद यांच्या या वक्तव्यानंतर 'इमारत-ए-शरिया'नं त्यांना धर्मातून बहिष्कृत केल्याचं घोषित केलं आहे. या घोषणेमुळे जर बिहारच्या जनतेचा विकास होत असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे खुर्शीद म्हणाले

पाटणा, दि. 30 - बिहार विधानसभेच्या आवारात 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्यामुळे नितीशकुमार यांच्या मंत्रीमंडळातील खुर्शीद ऊर्फ फिरोज अहमद यांच्या विरोधात एका संघटनेनं फतवा जारी केला आहे. इमारत-ए-शरिया नावाच्या संघटनेनं हा फतवा काढला आहे. या फतव्यात त्यांनी संयुक्त जनता दलाचे आमदार व बिहारचे अल्पसंख्याक मंत्री फिरोज अहमद यांना इस्लाम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलेलं आहे. इमारत-ए-शरिया या संघटनेचे मुफ्ती सुहैल अहमद कासमी यांनी हा फतवा जारी केला आहे. यामध्ये त्यांनी फिरोज अहमद यांना विश्वास न ठेवणारा तसेच मुस्लीम धर्मातून बहिष्कृत केलं आहे.फतवा जारी झाल्यानंतर फिरोज म्हणाले की, बिहारच्या लोकांसाठी मी जय श्रीरामच्या घोषणा दिला होत्या. या घोषणेमुळे जर बिहारच्या जनतेचा विकास होत असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझ्याविरोधात फतवा काढण्यापूर्वी त्यांनी माझा उद्देश लक्षात घ्यायला हवा होता. जय श्रीराम बोलण्यामागे माझा हेतू स्वच्छ होता. इमारत-ए-शरियाबद्दल मला प्रचंड आदर आहे. मात्र अशा फतव्यांना मी घाबरत नाही.खुर्शीद यांनी अलीकडेच विधानसभेच्या आवारात 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या होत्या. 'जय श्रीराम' म्हटल्यानं बिहारच्या १० कोटी जनतेचा फायदा होणार असेल तर मी सकाळ-संध्याकाळ जय श्रीराम म्हणायला तयार आहे. इस्लाममध्ये द्वेषाला थारा नाही. प्रेम हाच इस्लामचा पाया आहे. रहीमसोबत मी रामालाही पूजतो, असं त्यांनी म्हटलं होतं.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या कॅबिनेटचा विस्तार केला आहे. काही खाती नव्या मंत्र्यांना देताना विभागणीही करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याकडे अर्थ खात्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनेक मंत्र्यांना त्यांचं आधीचंच खातं देण्यात आलं आहे, तर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली आहेत. शनिवारी संध्याकाळी पाटणा येथील राजभवनात राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींनी २६ नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. खुर्शीद आलम यांच्याकडे अल्पसंख्यक कल्याण आणि उस उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.बुधवारी संध्याकाळी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत बिहारच्या राजकीय वर्तुळात भूकंप आणला होता. संपूर्ण देशबांधवांसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. पण त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच मोदींनी नितीशकुमाराच्या या निर्णयाचं कौतुक करत जे काही ट्विट केलं होतं ते पाहून हळूहळू बिहारच्या राजकारणातलं बदललेलं चित्र स्पष्ट होऊ लागलं. त्यानंतर भाजपाच्या साथीनं त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.