शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जाट समाजाचे ओबीसी आरक्षण रद्द

By admin | Updated: March 18, 2015 00:08 IST

जाटांना इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) कोट्यात आरक्षण देण्याबाबत तत्कालीन संपुआ सरकारने जारी केलेला वटहुकूम मंगळवारी रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने जबर हादरा दिला आहे.

सुप्रीम कोर्टाचा दणका : संपुआ सरकारचा वटहुकूम निष्प्रभनवी दिल्ली : जाटांना इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) कोट्यात आरक्षण देण्याबाबत तत्कालीन संपुआ सरकारने जारी केलेला वटहुकूम मंगळवारी रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने जबर हादरा दिला आहे.जाटांचा ओबीसींच्या आरक्षणात समावेश करण्याचा तत्कालीन संपुआ सरकारचा वटहुकूम रद्द करीत असल्याचे रंजन गोगोई व आर.एफ. नरीमन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. जाट समुदाय सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास नसल्यामुळे त्यांचा ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करता येणार नाही, असा निष्कर्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने काढला होता. त्याकडे डोळेझाक करीत केंद्राने निर्णय घेतल्यामुळे तो सदोष असल्याचे खंडपीठाने म्हटले.ओबीसी आरक्षणाबाबत मंडल आयोगाच्या शिफारशींचा अंमल करण्याचा ऐतिहासिक आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या बृहद् खंडपीठाने दिला होता. या निर्णयाचा हवाला देताना खंडपीठाने म्हटले की, जात हा प्रमुख घटक असला तरी मागासलेपण निर्धारित करण्याचा तो एकमात्र आधार ठरत नाही. भूतकाळात ओबीसींच्या यादीत समावेशाबाबत झालेल्या संभाव्य चुका पाहता दुसऱ्या जातींना चुकीच्या रूपाने समावेश करण्याचा आधार मानता येणार नाही. जाट हा राजकीयदृष्ट्या संघटित असा समुदाय असून त्यांच्या समावेशामुळे अन्य मागास जातींच्या कल्याणावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. सरकारला संवैधानिक मार्गानुसार एखाद्या वर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार आहे; मात्र जातींच्या मागासलेपणाबाबत दशकानुदशकांच्या निष्कर्षाच्या आधारावर तसे करण्याला मुभा नाही. ओबीसी आरक्षण रक्षा समितीने केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेनंतर न्यायालयाने जाट समुदायाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासंबंधी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींकडे डोळेझाक का केली? असा सवाल केंद्राला केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)४जाटांचा ओबीसीच्या आरक्षणात समावेश करण्याचे प्रकरण गंभीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तत्कालीन सरकारने ४ मार्च रोजी अधिसूचना जारी करताना सरकारने डोक्याचा वापर केला की नाही, हे पाहता यावे यासाठी सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाने त्यासंबंधी सर्व मजकूर, अहवाल आणि फायली सादर कराव्यात, असा आदेशही खंडपीठाने दिला होता. काय आहे सरकारचा युक्तिवाद?४रालोआ सरकारने गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये संपुआच्या निर्णयाचे समर्थन केले होते. समाजशास्त्र आणि संशोधन परिषदेच्या (आयसीएसएसआर) तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षाच्या आधारावर मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला होता. ४सरकारने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नाकारत तज्ज्ञ समितीच्या निष्कर्षाचा आधार घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस पाठविल्यानंतर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. दिल्लीचे रामसिंग, अशोककुमार, अशोक यादव या ओबीसी समुदायातील प्रतिनिधींनी वैयक्तिकरीत्याही केंद्राच्या वटहुकमाला आव्हान दिले. ४जाट समुदाय अन्य समुदायाच्या तुलनेत प्रगत असून त्यांचा ओबीसींच्या यादीत समावेश केला जाऊ शकत नाही. मागासवर्गीय आयोगाने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी तसा अहवाल दिला असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.