शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जंतर मंतरवर आंदोलने बंद; जे करायचे, ते रामलीला मैदानातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 04:34 IST

राजधानी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी यापुढे कोणतीही राजकीय, सामाजिक आंदोलने, मोर्चे व घोषणाबाजी करता येणार नाही.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी यापुढे कोणतीही राजकीय, सामाजिक आंदोलने, मोर्चे व घोषणाबाजी करता येणार नाही. राष्ट्रीय हरित लवादाने तिथे यापुढे आंदोलनाला परवानी देऊ नये, असे आदेश दिल्ली सरकारला दिले आहेत. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी न्या. आर. एस. राठोड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज हा निर्णय घेतला.आता अशा प्रकारची आंदोलने दिल्लीच्या रामलीला मैदानावरच होऊ शकतील. आतापर्यंत सर्व प्रमुख आंदोलनांचे जंतर मंतर हेच ठिकाण होते. मात्र तिथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले व्यासपीठ, ध्वनिवर्धक यंत्रणा ताबडतोब हटवा, असेही आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकार, नवी दिल्ली महापालिका आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.जंतर मंतरवर होणाºया आंदोलनांमुळे पर्यावरणविषयक कायद्याचे उल्लंघन होते, प्रचंड ध्वनिप्रदूषण होते आणि स्थानिकांना त्याचा प्रचंड त्रास होतो, अशी याचिका दिल्लीतील एका रहिवाशाने आयोगापुढे केली होती. ते म्हणणे मान्य करून, हा आदेश देण्यात आला. जंतर मंतर परिसरातील सर्व कचरा एका महिन्यात हटवून, हा भाग स्वच्छ करावा, असे आयोगाने महापालिकेला सांगितले आहे.तेथील अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे आणि महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालय व विधान भवन भागाकडे मोर्चे नेण्यास बंदी घातली होती. पूर्वी मोर्चे काळा घोडा तसेच मंत्रालयापासून एक किलोमीटरवर अडवण्यात येत असत. काही वेळा तिथे धरणेही धरले जात असे. उच्च न्यायालयाने त्यांची दखल घेत मोर्चे, आंदोलने, धरणे हे आझाद मैदानापुरते मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले होते. अनेक वर्षांनी तसाच निर्णय दिल्लीसाठी राष्ट्रीय हरित आयोगाने दिला आहे.

टॅग्स :Jantar Mantarजंतर मंतर