शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मधुचंद्राच्या रात्री MBA पतीनं पत्नीसमोर ठेवली IAS होण्याची अट; पुढे भलताच प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:48 IST

लग्नानंतर पहिल्याच रात्री गोल्ड मेडलिस्ट पतीनं पत्नीसमोर ठेवली मोठी अट

जमशेदपूर: मधुचंद्राच्या रात्री एका पतीनं पत्नीसमोर अट ठेवली. त्या अटीची पूर्तता करणं तिच्यासाठी अवघड होतं. त्यामुळे तिचा संसार होण्यापूर्वीच मोडला. एमबीए झालेल्या पतीनं पत्नीसमोर आयएएस बनण्याची अट ठेवली. यामुळे लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये संवाद झालेला नाही. सध्या महिला न्यायासाठी न्यायालयाच्या चकरा मारत आहे.

झारखंडच्या पूर्व सिंहभूममध्ये वास्तव्यास असलेल्या पल्लवी मंडलचा विवाह १८ जून २०१८ रोजी परसुडिहचा रहिवासी असलेल्या जयमाल्य मंडलशी झाला. पल्लवीचे वडील प्रदूत कुमार मंडल यांनी आशीर्वाद देत पल्लवीची पाठवणी केली. दोन वर्षांत आयएएस होण्याची अट पती जयमाल्य मंडल यांनी पत्नी पल्लवीसमोर ठेवली. आयएएस होण्यात अपयश आल्यास तुझा आणि माझा कोणताही संबंध नसेल असं म्हणत जयमाल्यनं टोकाची भूमिका घेतली.

जयमाल्य मस्करी करत असावा असं पल्लवीला सुरुवातीला वाटलं. मात्र एमबीएमध्ये सुवर्ण पदक विजेता असलेला जयमाल्य याबद्दल गंभीर होता. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी जयमाल्य मुलाखत देण्यासाठी निघाला. त्यानंतर तो बरेच दिवस घरी परतला नाही. घरी आला, त्यावेळी त्याचं वागणं बोलणं बदललं होतं. त्यामुळे पल्लवीच्या मनात संभ्रम निर्माण झाला.

सासू कृष्णा मंडल, सासरे भावेश मंडल, दीर देवमाल्या मंडल, जाऊ झुंपा मंडल यांनी आपले हाल केल्याचा आरोप पल्लवीनं केला. सासरी राहून नवऱ्यासोबतचं नातं आणि संसार वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास वाढत गेला, अशा शब्दांत पल्लवीनं तिची व्यथा मांडली. यानंतर पल्लवीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पल्लवी आणि तिचं कुटुंब न्यायासाठी प्रयत्न करत आहे.