शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मधुचंद्राच्या रात्री MBA पतीनं पत्नीसमोर ठेवली IAS होण्याची अट; पुढे भलताच प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:48 IST

लग्नानंतर पहिल्याच रात्री गोल्ड मेडलिस्ट पतीनं पत्नीसमोर ठेवली मोठी अट

जमशेदपूर: मधुचंद्राच्या रात्री एका पतीनं पत्नीसमोर अट ठेवली. त्या अटीची पूर्तता करणं तिच्यासाठी अवघड होतं. त्यामुळे तिचा संसार होण्यापूर्वीच मोडला. एमबीए झालेल्या पतीनं पत्नीसमोर आयएएस बनण्याची अट ठेवली. यामुळे लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये संवाद झालेला नाही. सध्या महिला न्यायासाठी न्यायालयाच्या चकरा मारत आहे.

झारखंडच्या पूर्व सिंहभूममध्ये वास्तव्यास असलेल्या पल्लवी मंडलचा विवाह १८ जून २०१८ रोजी परसुडिहचा रहिवासी असलेल्या जयमाल्य मंडलशी झाला. पल्लवीचे वडील प्रदूत कुमार मंडल यांनी आशीर्वाद देत पल्लवीची पाठवणी केली. दोन वर्षांत आयएएस होण्याची अट पती जयमाल्य मंडल यांनी पत्नी पल्लवीसमोर ठेवली. आयएएस होण्यात अपयश आल्यास तुझा आणि माझा कोणताही संबंध नसेल असं म्हणत जयमाल्यनं टोकाची भूमिका घेतली.

जयमाल्य मस्करी करत असावा असं पल्लवीला सुरुवातीला वाटलं. मात्र एमबीएमध्ये सुवर्ण पदक विजेता असलेला जयमाल्य याबद्दल गंभीर होता. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी जयमाल्य मुलाखत देण्यासाठी निघाला. त्यानंतर तो बरेच दिवस घरी परतला नाही. घरी आला, त्यावेळी त्याचं वागणं बोलणं बदललं होतं. त्यामुळे पल्लवीच्या मनात संभ्रम निर्माण झाला.

सासू कृष्णा मंडल, सासरे भावेश मंडल, दीर देवमाल्या मंडल, जाऊ झुंपा मंडल यांनी आपले हाल केल्याचा आरोप पल्लवीनं केला. सासरी राहून नवऱ्यासोबतचं नातं आणि संसार वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास वाढत गेला, अशा शब्दांत पल्लवीनं तिची व्यथा मांडली. यानंतर पल्लवीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पल्लवी आणि तिचं कुटुंब न्यायासाठी प्रयत्न करत आहे.