शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

मधुचंद्राच्या रात्री MBA पतीनं पत्नीसमोर ठेवली IAS होण्याची अट; पुढे भलताच प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:48 IST

लग्नानंतर पहिल्याच रात्री गोल्ड मेडलिस्ट पतीनं पत्नीसमोर ठेवली मोठी अट

जमशेदपूर: मधुचंद्राच्या रात्री एका पतीनं पत्नीसमोर अट ठेवली. त्या अटीची पूर्तता करणं तिच्यासाठी अवघड होतं. त्यामुळे तिचा संसार होण्यापूर्वीच मोडला. एमबीए झालेल्या पतीनं पत्नीसमोर आयएएस बनण्याची अट ठेवली. यामुळे लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये संवाद झालेला नाही. सध्या महिला न्यायासाठी न्यायालयाच्या चकरा मारत आहे.

झारखंडच्या पूर्व सिंहभूममध्ये वास्तव्यास असलेल्या पल्लवी मंडलचा विवाह १८ जून २०१८ रोजी परसुडिहचा रहिवासी असलेल्या जयमाल्य मंडलशी झाला. पल्लवीचे वडील प्रदूत कुमार मंडल यांनी आशीर्वाद देत पल्लवीची पाठवणी केली. दोन वर्षांत आयएएस होण्याची अट पती जयमाल्य मंडल यांनी पत्नी पल्लवीसमोर ठेवली. आयएएस होण्यात अपयश आल्यास तुझा आणि माझा कोणताही संबंध नसेल असं म्हणत जयमाल्यनं टोकाची भूमिका घेतली.

जयमाल्य मस्करी करत असावा असं पल्लवीला सुरुवातीला वाटलं. मात्र एमबीएमध्ये सुवर्ण पदक विजेता असलेला जयमाल्य याबद्दल गंभीर होता. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी जयमाल्य मुलाखत देण्यासाठी निघाला. त्यानंतर तो बरेच दिवस घरी परतला नाही. घरी आला, त्यावेळी त्याचं वागणं बोलणं बदललं होतं. त्यामुळे पल्लवीच्या मनात संभ्रम निर्माण झाला.

सासू कृष्णा मंडल, सासरे भावेश मंडल, दीर देवमाल्या मंडल, जाऊ झुंपा मंडल यांनी आपले हाल केल्याचा आरोप पल्लवीनं केला. सासरी राहून नवऱ्यासोबतचं नातं आणि संसार वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास वाढत गेला, अशा शब्दांत पल्लवीनं तिची व्यथा मांडली. यानंतर पल्लवीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पल्लवी आणि तिचं कुटुंब न्यायासाठी प्रयत्न करत आहे.