शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Jammu & Kashmir: एकता यात्रेच्या २७ वर्षांनंतर कलम ३७० हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 02:46 IST

भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी ११ डिसेंबर १९९१ रोजी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत १५ हजार किमीची एकता यात्रा काढली होती.

नवी दिल्ली : भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी ११ डिसेंबर १९९१ रोजी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत १५ हजार किमीची एकता यात्रा काढली होती. काश्मीरच्या लाल चौकात भारतीय तिरंगा फडकाविणे हे त्यांचे लक्ष्य होते. या यात्रेत असे दोन चेहरे होते त्यातील एका व्यक्तीकडे संपूर्ण यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी होती. यातील एक चेहरा म्हणजे नरेंद्र दामोदारदास मोदी. तर, दुसरा चेहरा म्हणजे अमित शहा.भाजपसाठी कलम ३७० त्याच्या स्थापनेपासूनच प्रमुख मुद्दा राहिलेला आहे. याचे कारण असे की, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ३७० कलम हटवू इच्छित होते. हे लक्ष्य पूर्ण करण्यापूर्वीच त्यांचा काश्मीरमध्ये मृत्यू झाला. पहिल्या कार्यकाळातच पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी ३७० हटविण्यासाठी अध्ययन सुरु केले. राज्यातील मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी- भाजप सरकार स्थापनेचा एक मोठा उद्देश हाही होता की, कलम ३७० बाबत जनता आणि स्थानिक राजकीय पक्षांमध्ये काय विचार आहे याचा अभ्यास केला जावा. त्यानंतर हे सरकार कोसळले आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपमध्ये हे कलम हटविण्याबाबत विचार केला गेला. पण, त्यावेळी परिस्थिती अनुकूल नव्हती. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने असे ठरविले की, जर २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार आले तर, पहिल्या एक- दीड वर्षात या मुद्यावर निर्णय घेतला जावा.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी