शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पाकव्याप्त काश्मीर अन् अक्साई चीन भारताचाच भाग, सरकारनं लवकर निर्णय घ्यावा- बिपीन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:54 IST

कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे.

नवी दिल्लीः कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर आणि अक्साई चीनच्या ताब्यावर राजकीय नेतृत्वानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अक्साई चीनचा जो भाग भारताच्या ताब्यात नाही तो परत कशा मिळवता येईल, याचा राजकीय नेतृत्वानं विचार करावा. यासाठी कूटनीतीचा मार्ग अवलंबवावा किंवा इतर कोणताही मार्ग, पण तो भाग परत भारतात आणा, अशी सूचनाच बिपीन रावत यांनी केली आहे.लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी कारगिल विजय दिवसाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं द्रासमध्ये कारगिल वॉर मेमोरियलवर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी बंदुकधाऱ्या काश्मिरी तरुणांनाही इशारा दिला आहे. काश्मीरमध्ये जर तुम्ही सेनेविरोधात बंदूक वापरली, तर तुम्ही कब्रस्थानात जाल आणि तुमची बंदूक आमच्याकडे येईल. काश्मिरी तरुणांनी चांगला मार्ग अवलंबवावा आणि रोजगाराच्या दृष्टीनं पुढची पावलं उचलावीत.काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला शुक्रवारी २0 वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या आदल्याच दिवशी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला ठणकावले. पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका, असा सज्जड दम रावत यांनी पाकिस्तानला भरला होता. या युद्धाला शुक्रवारी 20 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभर ‘ऑपरेशन विजय’चा वर्धापन दिन सर्वत्र उत्साहाने साजरा होणार आहे. भारताच्या हद्दीतून पाकच्या प्रत्येक जवानाला हाकलून देण्यात भारतीय जवानांना 26 जुलै रोजी यश आले. त्यामुळेच विजय दिनाचे महत्त्व आहे.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत