शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पाकव्याप्त काश्मीर अन् अक्साई चीन भारताचाच भाग, सरकारनं लवकर निर्णय घ्यावा- बिपीन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:54 IST

कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे.

नवी दिल्लीः कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर आणि अक्साई चीनच्या ताब्यावर राजकीय नेतृत्वानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अक्साई चीनचा जो भाग भारताच्या ताब्यात नाही तो परत कशा मिळवता येईल, याचा राजकीय नेतृत्वानं विचार करावा. यासाठी कूटनीतीचा मार्ग अवलंबवावा किंवा इतर कोणताही मार्ग, पण तो भाग परत भारतात आणा, अशी सूचनाच बिपीन रावत यांनी केली आहे.लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी कारगिल विजय दिवसाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं द्रासमध्ये कारगिल वॉर मेमोरियलवर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी बंदुकधाऱ्या काश्मिरी तरुणांनाही इशारा दिला आहे. काश्मीरमध्ये जर तुम्ही सेनेविरोधात बंदूक वापरली, तर तुम्ही कब्रस्थानात जाल आणि तुमची बंदूक आमच्याकडे येईल. काश्मिरी तरुणांनी चांगला मार्ग अवलंबवावा आणि रोजगाराच्या दृष्टीनं पुढची पावलं उचलावीत.काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला शुक्रवारी २0 वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या आदल्याच दिवशी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला ठणकावले. पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका, असा सज्जड दम रावत यांनी पाकिस्तानला भरला होता. या युद्धाला शुक्रवारी 20 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभर ‘ऑपरेशन विजय’चा वर्धापन दिन सर्वत्र उत्साहाने साजरा होणार आहे. भारताच्या हद्दीतून पाकच्या प्रत्येक जवानाला हाकलून देण्यात भारतीय जवानांना 26 जुलै रोजी यश आले. त्यामुळेच विजय दिनाचे महत्त्व आहे.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत