शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

“हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा”; लोकसभेत बोलताना फारुक अब्दुल्ला आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:22 IST

Parliament No-confidence Motion Debate: तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत आणले? अशी विचारणा करत फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली.

Parliament No-confidence Motion Debate: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर दुसऱ्या दिवशी चर्चा केली जात आहे. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर लोकसभेत येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला अविश्वास ठरावावर बोलताना चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा, असे सांगत फारूक अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केला. 

केंद्रातील सरकार काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याचा दावा करत आहे, मात्र, तेथील परिस्थिती काही वेगळीच आहे. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत अब्दुल्ला म्हणाले की, हवे तर माझे काही ऐकू नका. मात्र, तुमच्या नेत्यांनी काय सांगितले, ते तरी ऐका. मित्र बदलता येतात, शेजारी बदलता येत नाहीत, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. जर आपण आपल्या शेजाऱ्याशी मैत्रीने राहिलो तर दोघांची प्रगती होईल. केवळ शत्रूत्व पत्करल्यास प्रगती कमी होईल, याची आठवण फारूक अब्दुल्ला यांनी करून दिली. 

मणिपूरमध्ये प्रेमाने काम करावे लागेल

तुमचा विश्वास असो वा नसो, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्याशी युद्ध करा. तुम्हाला कोणीही अडवलेले नाही. आम्ही तर कधीच थांबवलेले नाही, असे सांगताना, आम्ही पाकिस्तानी असल्याचा संशय आमच्यावर घेऊ नका. किती दिवस हा संशय घेणार आहात? असा संशय घेणे आता बंद करा आणि आम्हाला तुमच्यात सामावून घ्या. आम्ही या देशासोबत होतो आणि या देशासोबतच कायम उभे राहू, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. तसेच हा देश जगावा आणि वाढावा, यासाठी आम्हीही गोळ्या झेलल्या आहेत. आम्हीही त्याग केला आहे. हे कधीही विसरू नका. तसेच जोपर्यंत मणिपूरचा संबंध आहे, तिथेही आपल्याला प्रेमाने काम करावे लागेल. त्यांची मने जिंकून त्यांना वाचवावे लागेल, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी १४० कोटी लोकांचे नेतृत्व करतायत

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या देशाची जबाबदारी आहे. केवळ हिंदूंचीच नव्हे तर या देशात राहणारे मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख यांचीही जबाबदारी आहे. पंतप्रधान भारताचे नेतृत्व करतात. १४० कोटी लोकांचे नेतृत्व करतात. आपण सर्व चुका करतो. आम्ही काश्मिरी हिंदूंना परत आणण्याचाही प्रयत्न केला. तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत आणले? एकही नाही, अशी टीकाही फारूक अब्दुल्ला यांनी केली. 

दरम्यान, याला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भारताकडे एवढी मोठी शक्ती आहे, कोणताही शेजारी आमच्याशी लढण्याची हिंमत करू शकत नाही. संपूर्ण हिंदुस्थानी जनतेला पंतप्रधान मोदी आणि देशाचा अभिमान आहे, असे राय यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाlok sabhaलोकसभाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन