शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

“हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा”; लोकसभेत बोलताना फारुक अब्दुल्ला आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:22 IST

Parliament No-confidence Motion Debate: तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत आणले? अशी विचारणा करत फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली.

Parliament No-confidence Motion Debate: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर दुसऱ्या दिवशी चर्चा केली जात आहे. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर लोकसभेत येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला अविश्वास ठरावावर बोलताना चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा, असे सांगत फारूक अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केला. 

केंद्रातील सरकार काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याचा दावा करत आहे, मात्र, तेथील परिस्थिती काही वेगळीच आहे. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत अब्दुल्ला म्हणाले की, हवे तर माझे काही ऐकू नका. मात्र, तुमच्या नेत्यांनी काय सांगितले, ते तरी ऐका. मित्र बदलता येतात, शेजारी बदलता येत नाहीत, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. जर आपण आपल्या शेजाऱ्याशी मैत्रीने राहिलो तर दोघांची प्रगती होईल. केवळ शत्रूत्व पत्करल्यास प्रगती कमी होईल, याची आठवण फारूक अब्दुल्ला यांनी करून दिली. 

मणिपूरमध्ये प्रेमाने काम करावे लागेल

तुमचा विश्वास असो वा नसो, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्याशी युद्ध करा. तुम्हाला कोणीही अडवलेले नाही. आम्ही तर कधीच थांबवलेले नाही, असे सांगताना, आम्ही पाकिस्तानी असल्याचा संशय आमच्यावर घेऊ नका. किती दिवस हा संशय घेणार आहात? असा संशय घेणे आता बंद करा आणि आम्हाला तुमच्यात सामावून घ्या. आम्ही या देशासोबत होतो आणि या देशासोबतच कायम उभे राहू, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. तसेच हा देश जगावा आणि वाढावा, यासाठी आम्हीही गोळ्या झेलल्या आहेत. आम्हीही त्याग केला आहे. हे कधीही विसरू नका. तसेच जोपर्यंत मणिपूरचा संबंध आहे, तिथेही आपल्याला प्रेमाने काम करावे लागेल. त्यांची मने जिंकून त्यांना वाचवावे लागेल, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी १४० कोटी लोकांचे नेतृत्व करतायत

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या देशाची जबाबदारी आहे. केवळ हिंदूंचीच नव्हे तर या देशात राहणारे मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख यांचीही जबाबदारी आहे. पंतप्रधान भारताचे नेतृत्व करतात. १४० कोटी लोकांचे नेतृत्व करतात. आपण सर्व चुका करतो. आम्ही काश्मिरी हिंदूंना परत आणण्याचाही प्रयत्न केला. तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत आणले? एकही नाही, अशी टीकाही फारूक अब्दुल्ला यांनी केली. 

दरम्यान, याला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भारताकडे एवढी मोठी शक्ती आहे, कोणताही शेजारी आमच्याशी लढण्याची हिंमत करू शकत नाही. संपूर्ण हिंदुस्थानी जनतेला पंतप्रधान मोदी आणि देशाचा अभिमान आहे, असे राय यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाlok sabhaलोकसभाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन