शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Jammu And Kashmir : पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:16 IST

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येत आहे. जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे.जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच याआधी काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये सुरू झाली आहेत. डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 5 ऑगस्ट रोजी ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता 25 दिवसांनी डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा ही अद्याप ठप्पच आहे.   

कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर हळूहळू निर्बंध हटवण्यात आले होते. याआधी जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा संथगतीने सुरू करण्यात आली होती. मात्र जम्मूमध्ये पसरवत येण्यात असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तातडीने बंद करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता. 

जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या विकासाची आखणी सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच नोकरभरती सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, आगामी दोन- तीन महिन्यात जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये सरकारी खात्यातील 50 हजार जागा रिक्त असून या जागेवर लवकरच मेगाभरती करणार आहे. त्यामुळे  या भरतीचा फायदा या राज्यातील तरुणांनी घ्यावा असे आवाहन मलिक यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसांत काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने काही मोठ्या घोषणा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

तसेच राज्यातील जनतेला विविध अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील परिस्थिती सुधारत असून तेथील निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी लॅडलाईन सेवा चालू करण्यात आली आहे, तर जम्मू मधील सर्व 10 जिल्ह्यांमधील मोबाईल सेवा देखील सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे हळूहळू इंटरनेट सेवाही पूर्वपदावर आणण्याचं आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMobileमोबाइलArticle 370कलम 370