शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वादग्रस्त विधानामुळे मुफ्ती यांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 08:35 IST

मेहबूबा मुफ्ती यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसने टीका करत मूफ्ती यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे मेहबूबा मुफ्ती यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसने टीका करत मूफ्ती यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी जनतेच्या भावना दुखावल्याचं मत काँग्रेसकडून व्यक्त केलं जातं आहे.मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही.

श्रीनगर, दि. 31- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याला सर्वच स्तरातून विरोध होतो आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसने टीका करत मूफ्ती यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी जनतेच्या भावना दुखावल्याचं मत काँग्रेसकडून व्यक्त केलं जातं आहे.मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही, कारण त्याच्यासाठी अनेकांनी मोठं बलिदान दिलं असून त्याच्याशी राष्ट्राचा सन्मान जोडला गेला आहे. मेहबूबा यांच्या बोलण्याचा संदर्भ कोणताही असला तरी त्यांना राष्ट्रध्वजाच्या बाबतीत असं उदाहरण देण्याचा अधिकार त्यांना नाही, असं काँग्रेसच्या जम्मू-काश्मीर राज्य शाखेचे प्रवक्ते रवींदर शर्मा म्हणाले आहेत. 

काय म्हणाल्या मेहबूबा मुफ्ती?काश्मिरी जनतेला विशेषाधिकार देणाऱ्या घटनेतील कलम ३५ (अ) मध्ये हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम होतील, तिरंग्याचे रक्षण करण्यासाठी काश्मिरात कोणीही नसेल, असा इशारा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला आहे. घटनेच्या ३५ (अ) कलमान्वये जम्मू-काश्मीरचे ‘कायम निवासी’ कोण, हे ठरविण्याचा हक्क राज्याच्या विधानसभेला आहे, तसेच या कायम निवासी नागरिकांना विशेष हक्क आहेत. मेहबुबा यांनी घटनेतील या कलमाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या की, यात बदल केल्यास जम्मू-काश्मिरात तिरंगा फडकणार नाही. नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांचे जीवित धोक्यात येईल. हे कार्यकर्तेच ठामपणे काश्मिरात राष्ट्रध्वज फडकावतात.- या कलमातील हस्तक्षेप अजिबात स्वीकारला जाणार नाही, अशा खेळ्या करून तुम्ही भारताचा स्वीकार करणाऱ्या शक्तींनाच कमजोर करीत आहात. ‘वुई द सिटिझन्स’ नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेने घटनेतील ३५ (अ) कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे कलम संसदेसमोर मांडण्यातच आलेले नाही. राष्ट्रपतींच्या आदेशाने त्याची अंमलबजावणी करण्यात आली, त्यामुळे ते रद्द करण्यात यावे, अशी विनंती याचिकेत आहे.

‘पीओके’मध्ये विधानसभा अधिवेशनमेहबूबा म्हणाल्या की, आमच्या विधानसभेत तिकडच्या काश्मीरसाठी (पाकव्याप्त) काही जागा राखीव आहेत. या जागांवर नेमणुका व्हायला हव्यात. आपल्या विधानसभेचे वर्षातील एक अधिवेशन या काश्मिरात (भारतातील काश्मिरात) आणि एकदा त्या काश्मिरात (पाकिस्तानातील) व्हायला हवे. त्यामुळे आपण पर्यटन, प्रवास खुले करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकू.

नियंत्रण रेषेवरून व्यापार हवाविशाल रॅलीला संबोधित करताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, नियंत्रण रेषेवरील व्यापारी मार्ग बंद करण्याची परवानगी पीडीपी कधीच देणार नाही. याउलट पाकव्याप्त काश्मीरशी अधिकाधिक व्यापार वाढावा, यासाठी आणखी मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. वाघा सीमेवरून चरस आणि गांजाची तस्करी होत असते, तरीही हा मार्ग बंद केला गेला नाही, याचा त्यांनी या संदर्भात उल्लेख केला.