शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बसचा ब्रेक अचानक झाला फेल; जवानांनी वाचवला ४० प्रवाशांचा जीव, १० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 09:17 IST

जम्मू-काश्मीर पोलिसांसह भारतीय लष्कराच्या जवानांना NH-४४ वर मोठा अपघात टाळण्यात यश मिळालं आहे.

जम्मू-काश्मीरपोलिसांसह भारतीय लष्कराच्या जवानांना NH-४४ वर मोठा अपघात टाळण्यात यश मिळालं आहे. अमरनाथहून पंजाबमधील होशियारपूरला जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे अनेक लोक प्रवास करत असलेल्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं. जवानांनी अतिशय हुशारीने वाहनावर नियंत्रण ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली.

जम्मू-काश्मीरपोलिसांसह भारतीय लष्कराच्या जवानांनी बसचा वेग कमी केला. बसचा वेग जास्त असताना त्यांनी टायरखाली दगड ठेऊन वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्यात त्यांना यश आलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर बसवर नियंत्रण मिळवून नाल्यात पडण्यापासून वाचवण्यात आली.

बसमध्ये ४० प्रवासी होते, ज्यांना धक्का बसल्याचं सांगण्यात येत आहे. बसचे ब्रेक फेल झाल्यानंतर अनेक लोक बसच्या आतमध्ये धावू लागले, त्यामुळे अनेक जण जखमीही झाले. जखमींमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बसमध्ये ४० यात्रेकरू होते जे पंजाबमधील होशियारपूरला परतत होते. बनिहालजवळील नचलाना येथे पोहोचल्यानंतर ब्रेक फेल झाल्यामुळे चालक बस थांबवू शकला नाही. लष्कराच्या क्विक रिॲक्शन टीमने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना मदत केल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना नचलाना येथे वैद्यकीय मदत देण्यात आली. काही जणांना गंभीर दुखापतही झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिस