शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Jammu & Kashmir: मोदी सरकारने राज्यघटनेच्या मुळावरच घातला घाव - पी. चिदम्बरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 04:12 IST

‘आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विनाशकारी पाऊल उचलतील असे वाटले नव्हते’

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरशी संबंधित ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेऊन राज्यघटनेच्या मुळावरच घाव घातला असून हा इतिहासातील काळा दिवस आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे.चिदम्बरम म्हणाले की, कलम ३७०, ३५ अ या कलमांना भाजपचा असलेला विरोध आम्हा सर्वांनाच माहिती होता. भाजप ही कलमे हटविण्यासाठी काही हालचाली करेल याचीही कल्पना होती. मात्र आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते इतके मोठे विनाशकारी पाऊल उचलतील असे अजिबात वाटले नव्हते. भाजप सरकारने केवळ ३७० कलमच रद्द केले नाही, तर जम्मू-काश्मीरचे एक राज्य म्हणून असलेले अस्तित्वच संपवून टाकले. राज्यघटनेतील कलम ३ व कलम ३७०चा चुकीचा अर्थ लावून भाजपने ही कृती केली आहे. जम्मू-काश्मीरबाबत झाला तसा निर्णय भाजप सरकार भविष्यात कोणत्याही राज्याबाबत घेण्याचा धोका निर्माण झाला आहे. असा निर्णय घ्यायचा झाल्यास भाजप प्रथम त्या राज्यातील सरकार बरखास्त करेल व त्यानंतर तिथे राष्ट्रपती राजवट लादेल. राज्य विधानसभेचे अधिकार संसद आपल्या हातात घेईल. केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावाला संसद मान्यता देईल व राज्याचे अस्तित्वच नष्ट केले जाईल अशी शक्यता आहे.ते म्हणाले की, राज्याचा दर्जा नष्ट करून त्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्याचा हा सिलसिला काश्मीरपर्यंतच थांबेल असे वाटत नाही. त्यामुळे देशातील व प्रत्येक राज्यातील जनतेने आता सावध व्हायला हवे. ३७० कलम रद्द करून काश्मीरच्या अस्तित्वाला भाजपने जे नख लावले आहे ते कृत्य घटनाविरोधी आहे. त्यासंदर्भात राज्यसभेत सादर झालेला प्रस्तावदेखील बेकायदेशीर आहे. भारतातील संघराज्य पद्धतीला सद्य:स्थितीत मोठा धोका निर्माण झाला आहे. भाजप सरकार प्रत्येक राज्याचे विघटन करण्याची शक्यता आहे. कलम ३७० रद्द करण्याचे ठरवून मोदी सरकारने राज्यघटनेच्या मुळावरच घाव घातला आहे. हे सरकार अशाच पद्धतीने निर्णय घेत राहिले तर त्यातून भारताच्या विघटनाची बीजे रोवली जातील.राज्याचा दर्जा नष्ट करून त्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्याचा हा सिलसिला काश्मीरपर्यंतच थांबेल असे वाटत नाही. त्यामुळे देशातील व प्रत्येक राज्यातील जनतेने आता सावध व्हायला हवे. ३७० कलम रद्द करून काश्मीरच्या अस्तित्वाला भाजपने जे नख लावले आहे ते कृत्य घटनाविरोधी आहे. - पी. चिदम्बरमकाश्मिरी जनतेचा विश्वासघातजम्मू-काश्मीरबद्दलचे ३७० कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय एकतर्फी व धक्कादायक आहे. हा निर्णय घेऊन केंद्राने जम्मू-काश्मीरच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. १९४७ साली काश्मीर मोठ्या विश्वासाने भारतामध्ये सामील झाले होते. त्या विश्वासालाच केंद्र सरकारने तडा दिला आहे. याचे दूरगामी व भयंकर परिणाम होणार आहेत. हे कलम रद्द करू नका अशी मागणी काश्मीरमध्ये रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली होती. ती केंद्र सरकारने धुडकावून लावली. जम्मू-काश्मीरबद्दल घेतलेला निर्णय हा केंद्राचा कपटी डाव आहे. या घातक निर्णयाचे प्रतिकूल परिणाम येत्या काही आठवड्यांत दिसून येतीलच. काश्मीरमध्ये कोणतीही महत्त्वाची घडामोड होणार नाही असे केंद्र सरकारचे प्रतिनिधी सांगत होते. पण सोमवारच्या घटनांतून हे सिद्ध झाले की हे लोक आमच्याशी चक्क खोटे बोलत होते. काश्मीरमध्ये लाखो सुरक्षा जवान तैनात आहेत. जम्मू-काश्मीरचे जणू बंदिशाळेत रूपांतर केल्यानंतरच केंद्र सरकारने राज्यघटनेतील ३७० कलम रद्द करण्याची घोषणा केली.- ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे नेतेकाळा दिवसआजचा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. राज्यघटनेचे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे अवैध आणि राज्यघटनाविरोधी आहे. १९४७ साली तत्कालीन जम्मू-काश्मीर सरकारने टू नेशन सिद्धान्ताला विरोध दर्शविला होता. आता हा निर्णयही चुकीचा ठरला आहे. मी सध्या नजरकैदेत आहे. मला सध्या कुणालाही भेटण्याची परवानगी नाही. मला माझे म्हणणे मांडण्याची संधी नेमकी कधी मिळेल, याची मला सध्यातरी कसली खात्री नाही. हाच तो भारत आहे का ज्यात आमचे विलीनीकरण करून घेण्यात आले आहे?- मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री, अध्यक्ष, पीडीपी

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370P. Chidambaramपी. चिदंबरम