शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

जम्मू-काश्मीरची ओळख पुसली जाणार नाही, राज्यपाल मलिक यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 05:55 IST

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने जम्मू-काश्मीरची ओळख डावावर लावली गेली किंवा ती पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असे काहीही नाही

श्रीनगर : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने जम्मू-काश्मीरची ओळख डावावर लावली गेली किंवा ती पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असे काहीही नाही, अशी ग्वाही राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी येथे गुरुवारी ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दिली. श्रीनगर येथील शेर-ए- काश्मीर स्टेडियमवर ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते.केंद्राने घडवून आणलेले बदल ऐतिहासिक असून त्यामुळे विकासाचे नवे दार उघडले जाईल. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील विविध समुदायांच्या भाषा आणि संस्कृतीचा विकास होण्यासही मदत होईल. केंद्र सरकारने केलेल्या बदलांमुळे आर्थिक विकास आणि भरभराटीतील अडथळे दूर होतील, असे त्यांनी नमूद केले. ३१ आॅक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती होणार असल्यामुळे मलिक यांचे हे राज्यपाल म्हणून अखेरचे सार्वजनिक भाषण होते.यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये या राज्यातील जनतेचे लक्ष रोटी, कपडा और मकान या मुद्यांकडे वेधले गेले नाही, ही आश्चर्याची बाब आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये येथील जनता आर्थिक विकास, शांतता आणि समृद्धी या मुख्य मुद्यांपासून दूर राहिली. त्याऐवजी जनतेचे लक्ष त्यांच्या जीवनाशी विसंगत मुद्यांकडे वेधून त्यांची दिशाभूल केली गेली, असे त्यांनी स्पष्ट केले. या राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर हा पहिलाच स्वातंत्र्यदिन होता. राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्र सरकारने उचललेल्या पावलामुळे जम्मू-काश्मीरमध्ये चांगले प्रशासन, आत्मनिर्भरता आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोबतच देशाच्या अन्य भागाशी समानतेचा भाव निर्माण होेईल, असे मलिक यांनी म्हटले.भारतीय राज्यघटनेने प्रादेशिक ओळख समृद्ध करण्याला मुभा दिली आहे. जम्मू-काश्मीरची ओळख संपुष्टात आणली जाईल, अशी चिंता कुणीही करू नये. राजकीय प्रतिनिधित्व नसलेल्या स्थानिक जाती-जमातींना नव्या प्रणालीत स्थान मिळेल, असे आश्वासनही मलिक यांनी दिले. काश्मिरी, डोगरी, गोजरी, पहाडी, बाल्टी, शीना आणि अन्य भाषांना नव्या व्यवस्थेत फुलण्याची संधी मिळेल. विविध जाती-जमातींना आजवर राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही, त्यांना योग्य संधी मिळेल. काश्मिरी पंडितांना खोऱ्यात सुरक्षितरीत्या परतता यावे यासाठी सरकार कटिबद्ध आहे.अतिरेक्यांचा पराभव निश्चित....सरकार दहशतवाद खपवून घेणार नाही. सशस्त्र दलांकडून अतिरेक्यांना निश्चितच पराभव पत्करावा लागेल. स्थानिक युवकांची अतिरेकी संघटनांमध्ये होणारी भरती तसेच शुक्रवारच्या नमाजाच्यावेळी होणाºया दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत, असेही मलिक म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndependence Dayस्वातंत्र्य दिन