शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवीन सरकार येताच जम्मू काश्मीरमध्ये हल्ले सुरु; शोपियानमध्ये बिगर काश्मिरी तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:45 IST

जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये बिगर काश्मीरी नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली आहे.

Jammu and Kashmir : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला काही दिवस उलटत नाही तोवर जम्मू काश्मीरमध्ये हल्ले सुरु झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका परराज्यातील एका व्यक्तीला लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये संघटित दहशतवाद कमी झाल्यानंतर टार्गेट किलिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गेल्या वर्षीही दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या भागात हिंदू आणि बिगर काश्मिरी लोकांची हत्या केली होती. अनंतनाग, पुलवामा आणि पुंछमध्ये टार्गेट किलिंगच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा शोपियानमध्ये बिगर काश्मिरी तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अशोक चौहान असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला. मात्र, या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बुधवारी ओमर अब्दुला यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१९ साली कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक पार पडली. ओमर अब्दुला यांच्यासह यावेळी पाच मंत्र्यांनी शपथ घेतली. यातील तीन मंत्री हे जम्मू आणि दोन काश्मीर खोऱ्यातील आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्र्यांना दल सरोवराच्या काठावरील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

दरम्यान, गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमाभागातील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी मोहिम सुरु केली आहे. काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराने गुरसाई टॉप भागातील मोहरी शाहस्टारमध्ये संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यात काही वेळात गोळीबार झाला. 

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग करत असताना हब्बा कादल भागात शीख समुदायाच्या दोन लोकांना एके रायफलने गोळ्या घातल्या होत्या. या हल्ल्यात अमृतसर येथील रहिवासी अमृत पाल आणि रोहित यांचा मृत्यू झाला. त्याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची हत्या केली होती.