शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

जम्मू काश्मीरमधील तुरुंगातून फुटीरतावाद्यांचा पाकिस्तानशी संपर्क?

By admin | Updated: April 3, 2017 09:00 IST

बारामुल्ला जिल्ह्यातील एका तुरुंगात विघातक साहित्यासहित 14 मोबाइल फोन आढळून आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 3 - उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील एका तुरुंगात विघातक साहित्यासहित 14 मोबाइल फोन आढळून आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलचा वापर फुटीरतावादी आणि सीमेपलिकडील देश पाकिस्तानातील लोकांशी संवाद साधण्यासाठी करण्यात येत होता, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही कैद्यांविरोधात एफआयआर दाखल करुन त्यांची चौकशी सुरू केली आहे. तसंच फॉरेन्सिक टीमकडून मोबाइल डेटाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. बारामुल्लातील तुरुंगात मोबाइल आणि अन्य साम्रगीचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत 14 फोन जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार,  व्हॉट्सअॅपचाही वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
 
तुरुंगातील काही फुटीरतावाद्यांकडे विघातक साहित्यही आढळून आली आहे, ज्यांचा संबंध शोधण्यात येत आहे. फॉरेन्सिक टीमकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतरच या फुटीरतावाद्यांचे सीमेपलिकडील लोकांशी काही संबंध आहे का याची माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवादी जम्मू काश्मीरमधील एका पोलीस अधिका-याच्या घरात घुसले होते. तेथे अंदाधुंद गोळीबार करत या दहशतवाद्यांनी वाहन पेटवलं होतं. हा पोलीस अधिकारी घाटीतील त्यांच्या घरात घुसून कुटुंबीयांना त्रास द्यायचा, असं या दहशतवाद्यांचं म्हणणं होतं आणि याचाच बदला त्यांनी घेतल्याचा दावाही केला.  
 
श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद
जमू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद तर 11 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान तर पोलिसांचे सात जवान जखमी झाले आहेत.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशरी चेनानी या बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर हा हल्ला झाला. पंतप्रधान मोदी येणार आहेत म्हणून श्रीनगर बंद ठेवावे, असे आवाहन फुटीरतावाद्यांनी केले होते.
 
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास नौहट्टा येथील गंजबक्ष पार्कमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू - काश्मीर दौऱ्यावर येणार असल्याने सकाळपासून तैनात असलेले अधिकारी सायंकाळच्या वेळी थोडा वेळ आराम करत होते. त्याच वेळी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.