शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 20:11 IST

S Jaishankar Pakistan Visit, Farooq Abdullah: एस जयशंकर यांच्या आधी गेल्या वेळी सुषमा स्वराज पाकिस्तानात गेल्या होत्या

S Jaishankar Pakistan Visit, Farooq Abdullah: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे शांघाय सहयोग संघटनेत ( SCO ) सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबरला पाकिस्तानला जाणार आहेत. जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही चांगली बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सामान्यत: अशा बैठकांमध्ये पंतप्रधान सहभागी होण्यासाठी जातात, पण सध्या आपले परराष्ट्र मंत्री जात आहेत याचा मला आनंद आहे. अब्दुल्ला पुढे म्हणाले की, मला आशा आहे जयशंकर हे SCO व्यतिरिक्तही काही गोष्टींवर चर्चा करतील. भारत-पाक या दोन्ही देशांमधील संबंध कसे सुधारावेत, द्वेष कसा कमी करता येईल आणि दोन्ही देशांमधील ऋणानुबंध कसे वाढवता येईल यावर ते बोलतील अशी आशा अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

काश्मीरमधील पत्रकारांशी बोलताना नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रमुखांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आणि इस्रायलचा निषेध केला. अब्दुल्ला म्हणाले, पश्चिम आशियातील परिस्थितीत इस्त्रायल ज्या प्रकारे लेबनान, सीरिया, इराण आणि पॅलेस्टाईनवर बॉम्बफेक करत आहे, ती बाब दुःखद आहे. जगाला वाचवायचे असेल तर युद्ध हा उपाय असूच शकत नाही. यात निष्पाप लोकांचा बळी जातो आहे.

गेल्या १० वर्षातील पहिला पाकिस्तान दौरा

परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तान दौरा हा गेल्या दशकातील कोणत्याही भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा पहिला दौरा असेल. गेल्या वेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हार्ट ऑफ एशिया परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेल्या होत्या. दोन्ही देशांमधील संबंध पाहता, द्विपक्षीय चर्चा होईल अशी आशा कमी आहे. मागच्या वेळी जेव्हा भारताने SCO चे आयोजन केले होते, तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो त्यात सहभागी होण्यासाठी आले होते, पण दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा झाली नव्हती.

इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी लष्कर तैनात करण्यात आले आहे. इस्लामाबादमध्ये ५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घटनेच्या कलम २४५ अंतर्गत लष्कर तैनात करण्यात आले आहे. लष्कराच्या तैनातीमागे दोन कारणे सांगितली जात आहेत. पहिले म्हणजे SCO ची शिखर परिषद आणि दुसरे म्हणजे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने केलेला विरोध. त्यामुळे पाकिस्तानच्या राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतPakistanपाकिस्तानFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला