शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कामावर परत या अन्यथा कारवाई केली जाईल, सरकारचा जम्मू-काश्मीर सोडणाऱ्या स्थलांतरित कामगारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 10:23 IST

जम्मूला परतलेले बरेच घाटीत काम करण्याबाबत सावध आहेत. तर काहींनी तूर्तास न येण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये घडत असलेल्या सततच्या दहशतवादी घटनांमुळे घाबरलेले अनेक स्थलांतरित कर्मचारी आपापल्या राज्यात परत जात आहेत. अशा परिस्थितीत काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी शनिवारी काश्मीरच्या 10 जिल्ह्यांच्या उपायुक्तांना आदेश दिला की, कोणताही स्थलांतरित कामगार राज्य सोडणार नाही याची खात्री करा आणि जर कोणी अनुपस्थित राहिल्यास त्याच्यावर सेवा नियमांनुसार कारवाई करा.

काही दिवसांपूर्वीच एका शाळेत शीख प्राचार्य आणि काश्मिरी हिंदू शिक्षकाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर असुरक्षित वाटणारे अनेक कर्मचारी जम्मू-काश्मीरमधून परत आपापल्या राज्यात जात आहेत. या लोकांनी प्रशासन असंवेदनशील असल्याचा ठपका ठेवला आहे. जम्मूला परतलेले बरेच लोक कामानिमित्त घाटीत परतण्याबाबत साशंक आहेत. तर काहींनी तूर्तास न येण्याचा निर्णय घेतला आहे. 

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तक्रारी

कर्मचारी म्हणाले की, जीव धोक्यात घालून कर्मचारी जम्मूला आले आहेत. त्यांना सुरक्षा कशी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  त्यांची भीती दूर करण्याऐवजी, आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे, त्यांना सुरक्षेचे आश्वासन देण्याऐवजी प्रशासन सेवा नियमांनुसार कारवाईची धमकी देत आहे. शनिवारी आयुक्त पांडुरंग पोल यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यात सुरक्षेबाबत विविध विषयांवर चर्चा झाली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी