शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Indian Army:भारतीय सैन्याची धाडसी कामगिरी; भीषण बर्फवृष्टीत 15 किमी पायपीट, 16 जणांची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:30 IST

Indian Army: भारतीय लष्कराने कौतुकास्पद कामगिरी करत भीषण बर्फवृष्टीत अडकलेल्या 16 जणांची सुटका केली आहे.

श्रीनगर: भारतीय लष्कराच्या शौर्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. आता पुन्हा एकदा भारतीय लष्कराने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जवानांनी भीषण बर्फवृष्टीत अडकलेल्या 16 जणांची सुटका केली. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंथन पासमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे 16 लोक तेथे अडकले होते, माहिती मिळताच लष्कराचे जवान पायी चालत तिथे गेले आणि त्यांचे प्राण वाचवले. तिथे पोहचण्यासाठी अतिशय कमी तापमानात जवानांना खूप संघर्ष करावा लागला. आता जवानांच्या धाडसाचे आणि मेहनतीचे कौतुक होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरणएएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, किश्तवाड जिल्ह्यात सतत बर्फवृष्टी आणि शून्य दृश्यमानता असतानाही, लष्कराच्या जवानांनी केवळ 15 किमी अंतर कापले नाही तर तेथे अडकलेल्या 16 लोकांना बाहेर काढले. या भागात 16 लोक अडकल्याची बातमी दुपारी 3 वाजता लष्कराला मिळाली, त्यानंतर तात्काळ जवानांचे एक पथक निघाले. हे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना औषधे व खाद्यपदार्थ देण्यात आले. या बचाव कार्याबद्दल लष्कराच्या जवानांचे कौतुक केले जात आहे.

लष्कराचे प्रवक्ते काय म्हणाले?या प्रकरणी बोलताना लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद म्हणाले, "सिंथनमध्ये काहीजण अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यांच्या बचावासाठी एक पथक तयार करण्यात आले. भीषण बर्फवृष्टी आणि दृश्यमानता नसतानाही टीमने NH 244 वर सुमारे 15 किलोमीटरचे अंतर पायी कापले आणि सिंथन खिंडीजवळील नागरिकांना वाचवले."

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान