शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

Indian Army:भारतीय सैन्याची धाडसी कामगिरी; भीषण बर्फवृष्टीत 15 किमी पायपीट, 16 जणांची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:30 IST

Indian Army: भारतीय लष्कराने कौतुकास्पद कामगिरी करत भीषण बर्फवृष्टीत अडकलेल्या 16 जणांची सुटका केली आहे.

श्रीनगर: भारतीय लष्कराच्या शौर्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. आता पुन्हा एकदा भारतीय लष्कराने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जवानांनी भीषण बर्फवृष्टीत अडकलेल्या 16 जणांची सुटका केली. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंथन पासमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे 16 लोक तेथे अडकले होते, माहिती मिळताच लष्कराचे जवान पायी चालत तिथे गेले आणि त्यांचे प्राण वाचवले. तिथे पोहचण्यासाठी अतिशय कमी तापमानात जवानांना खूप संघर्ष करावा लागला. आता जवानांच्या धाडसाचे आणि मेहनतीचे कौतुक होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरणएएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, किश्तवाड जिल्ह्यात सतत बर्फवृष्टी आणि शून्य दृश्यमानता असतानाही, लष्कराच्या जवानांनी केवळ 15 किमी अंतर कापले नाही तर तेथे अडकलेल्या 16 लोकांना बाहेर काढले. या भागात 16 लोक अडकल्याची बातमी दुपारी 3 वाजता लष्कराला मिळाली, त्यानंतर तात्काळ जवानांचे एक पथक निघाले. हे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना औषधे व खाद्यपदार्थ देण्यात आले. या बचाव कार्याबद्दल लष्कराच्या जवानांचे कौतुक केले जात आहे.

लष्कराचे प्रवक्ते काय म्हणाले?या प्रकरणी बोलताना लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद म्हणाले, "सिंथनमध्ये काहीजण अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यांच्या बचावासाठी एक पथक तयार करण्यात आले. भीषण बर्फवृष्टी आणि दृश्यमानता नसतानाही टीमने NH 244 वर सुमारे 15 किलोमीटरचे अंतर पायी कापले आणि सिंथन खिंडीजवळील नागरिकांना वाचवले."

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान