शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Jammu and Kashmir: ''मोदी सरकारकडून असंवैधानिकरीत्या राज्यांच्या नियंत्रण रेषा बदलण्याचा घाट''

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 13:19 IST

लोकसभेत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काश्मीरच्या इतिहासाची आठवण करून देत मोदी सरकारला चिमटा काढला.

नवी दिल्लीः राज्यसभेत मोदी सरकारच्या 370 कलमातील तरतुदी रद्द करण्याच्या शिफारशीला मंजुरी मिळाल्यानंतर आता ते विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. हा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या अखत्यारीत असल्याचं सांगत मोदी सरकारला असं विधेयक आणण्याचा अधिकार नसल्याचं विरोधकांनी सांगितलं. लोकसभेत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काश्मीरच्या इतिहासाची आठवण करून देत मोदी सरकारला चिमटा काढला.ते म्हणाले, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगळं होण्यापूर्वीही आंध्र प्रदेशच्या विधानसभेतल्या सदस्यांचा सल्ला घेण्यात आला होता आणि या गोष्टीची सभागृहात नोंदही करण्यात आली होती. यूपीएच्या सरकारनं कोणतंही असंवैधानिक काम केलेलं नाही. संविधानाच्या कलम तीनमध्ये ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीनुसार आंध्र प्रदेश विधानसभा आणि विधान परिषदेशी सल्लामसलत करून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगवेगळी राज्यं बनवण्यात आली होती. परंतु जम्मू-काश्मीरच्या बाबतीत तसं झालं नाही. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेला भंग करत राज्यपाल शासन आणून जम्मू-काश्मीरला दोन भागात विभागण्यात आलं.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370