शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Jallianwala Bagh massacre:: ब्रिटिश राजवटीच्या अंताला प्रारंभ, १०२ वा स्मतिदिन; ब्रिटिशांनी केली होती फक्त ३७९ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 07:15 IST

Jallianwala Bagh massacre: १३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या. 

अमृतसर : जालियानवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल रोजी १०२ वर्षे झाली. १९१९ मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या या नरसंहारात हजारो लोक मारले गेले, तरी ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांमध्ये फक्त ३७९ जणांच्या हत्येची व १२०० लोक जखमी झाल्याची नोंद केली गेली. हा नरसंहार ब्रिटिश भारताच्या इतिहासातील काळा अध्‍याय आहे. १३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या. हे हत्याकांड झाले तो  दिवस बैसाखी होती. या नरसंहारानंतर ब्रिटिश राजवटीच्या शेवटास सुरुवात झाली. नंतर देशाला उधम सिंहसारखा क्रांतिकारी मिळाला आणि भगत सिंग यांच्यासह अनेक युवकांच्या हृदयात देशभक्तीची लाट निर्माण झाली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यातूनच देशातील अनेक क्रांतीकारी तरुण ब्रिटीश राजवटीविरुद्ध एकवटले.

१० मिनिटे गोळीबार केला, १६५० फैरी झाडल्या... जालियानवाला बाग प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून दीड किलोमीटरवर आहे. १३ एप्रिल रोजी रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी सभा सुरू होती. या बागेत अनेक वर्षांपासून बैसाखीच्या दिवशी मेळाही व्हायचा. त्यात भाग घेण्यासाठी त्या दिवशी शेकडो लोक आले होते.जनरल डायर ९० सैनिकांसह तेथे आले व त्यांनी बागेला घेराव घालून कोणताही इशारा न देता नि:शस्त्र जमावावर गोळीबार सुरू केला. तेथून बाहेर पडण्याचा मार्ग खूप अरुंद होता व सैनिकांनी तो अडवून ठेवला होता. त्यामुळे अनेकांचा जीव गेला.डायर यांच्या आदेशावर ब्रिटिश लष्कराने न थांबता १० मिनिटे गोळीबार केला. १६५० फैरी झाडल्या गेल्या. गोळ्या संपल्यानंतरच तो थांबला, असे सांगितले जाते.अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या. त्या विहिरीला हुतात्मा विहीर म्हटले जाते. विहिरीत १२० मृतदेह सापडले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माहितीनुसार एक हजारांपेक्षा जास्त लोक हुतात्मा झाले व १५०० पेक्षा जास्त जखमी झाले.जनरल डायर रॉलेट कायद्याचे कट्टर समर्थक होते म्हणून त्यांना त्याला विरोध मान्य नव्हता. त्यांचा समज होता की, या नरसंहारानंतर भारतीय घाबरून जातील; परंतु ब्रिटिश सरकारविरोधात पूर्ण देशात आंदोलन निर्माण झाले.

टॅग्स :Jallianwala Bagh massacreजालियनवाला बाग हत्याकांड