शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

Jallianwala Bagh massacre:: ब्रिटिश राजवटीच्या अंताला प्रारंभ, १०२ वा स्मतिदिन; ब्रिटिशांनी केली होती फक्त ३७९ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 07:15 IST

Jallianwala Bagh massacre: १३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या. 

अमृतसर : जालियानवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल रोजी १०२ वर्षे झाली. १९१९ मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या या नरसंहारात हजारो लोक मारले गेले, तरी ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांमध्ये फक्त ३७९ जणांच्या हत्येची व १२०० लोक जखमी झाल्याची नोंद केली गेली. हा नरसंहार ब्रिटिश भारताच्या इतिहासातील काळा अध्‍याय आहे. १३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या. हे हत्याकांड झाले तो  दिवस बैसाखी होती. या नरसंहारानंतर ब्रिटिश राजवटीच्या शेवटास सुरुवात झाली. नंतर देशाला उधम सिंहसारखा क्रांतिकारी मिळाला आणि भगत सिंग यांच्यासह अनेक युवकांच्या हृदयात देशभक्तीची लाट निर्माण झाली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यातूनच देशातील अनेक क्रांतीकारी तरुण ब्रिटीश राजवटीविरुद्ध एकवटले.

१० मिनिटे गोळीबार केला, १६५० फैरी झाडल्या... जालियानवाला बाग प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून दीड किलोमीटरवर आहे. १३ एप्रिल रोजी रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी सभा सुरू होती. या बागेत अनेक वर्षांपासून बैसाखीच्या दिवशी मेळाही व्हायचा. त्यात भाग घेण्यासाठी त्या दिवशी शेकडो लोक आले होते.जनरल डायर ९० सैनिकांसह तेथे आले व त्यांनी बागेला घेराव घालून कोणताही इशारा न देता नि:शस्त्र जमावावर गोळीबार सुरू केला. तेथून बाहेर पडण्याचा मार्ग खूप अरुंद होता व सैनिकांनी तो अडवून ठेवला होता. त्यामुळे अनेकांचा जीव गेला.डायर यांच्या आदेशावर ब्रिटिश लष्कराने न थांबता १० मिनिटे गोळीबार केला. १६५० फैरी झाडल्या गेल्या. गोळ्या संपल्यानंतरच तो थांबला, असे सांगितले जाते.अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या. त्या विहिरीला हुतात्मा विहीर म्हटले जाते. विहिरीत १२० मृतदेह सापडले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माहितीनुसार एक हजारांपेक्षा जास्त लोक हुतात्मा झाले व १५०० पेक्षा जास्त जखमी झाले.जनरल डायर रॉलेट कायद्याचे कट्टर समर्थक होते म्हणून त्यांना त्याला विरोध मान्य नव्हता. त्यांचा समज होता की, या नरसंहारानंतर भारतीय घाबरून जातील; परंतु ब्रिटिश सरकारविरोधात पूर्ण देशात आंदोलन निर्माण झाले.

टॅग्स :Jallianwala Bagh massacreजालियनवाला बाग हत्याकांड