शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

Jallianwala Bagh massacre:: ब्रिटिश राजवटीच्या अंताला प्रारंभ, १०२ वा स्मतिदिन; ब्रिटिशांनी केली होती फक्त ३७९ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 07:15 IST

Jallianwala Bagh massacre: १३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या. 

अमृतसर : जालियानवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल रोजी १०२ वर्षे झाली. १९१९ मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या या नरसंहारात हजारो लोक मारले गेले, तरी ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांमध्ये फक्त ३७९ जणांच्या हत्येची व १२०० लोक जखमी झाल्याची नोंद केली गेली. हा नरसंहार ब्रिटिश भारताच्या इतिहासातील काळा अध्‍याय आहे. १३ एप्रिल रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी जलियानवाला बागेत उपस्थित असलेल्या नि:शस्त्र जमावावर वाट्टेल तशा गोळ्या चालवल्या. हे हत्याकांड झाले तो  दिवस बैसाखी होती. या नरसंहारानंतर ब्रिटिश राजवटीच्या शेवटास सुरुवात झाली. नंतर देशाला उधम सिंहसारखा क्रांतिकारी मिळाला आणि भगत सिंग यांच्यासह अनेक युवकांच्या हृदयात देशभक्तीची लाट निर्माण झाली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यातूनच देशातील अनेक क्रांतीकारी तरुण ब्रिटीश राजवटीविरुद्ध एकवटले.

१० मिनिटे गोळीबार केला, १६५० फैरी झाडल्या... जालियानवाला बाग प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून दीड किलोमीटरवर आहे. १३ एप्रिल रोजी रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी सभा सुरू होती. या बागेत अनेक वर्षांपासून बैसाखीच्या दिवशी मेळाही व्हायचा. त्यात भाग घेण्यासाठी त्या दिवशी शेकडो लोक आले होते.जनरल डायर ९० सैनिकांसह तेथे आले व त्यांनी बागेला घेराव घालून कोणताही इशारा न देता नि:शस्त्र जमावावर गोळीबार सुरू केला. तेथून बाहेर पडण्याचा मार्ग खूप अरुंद होता व सैनिकांनी तो अडवून ठेवला होता. त्यामुळे अनेकांचा जीव गेला.डायर यांच्या आदेशावर ब्रिटिश लष्कराने न थांबता १० मिनिटे गोळीबार केला. १६५० फैरी झाडल्या गेल्या. गोळ्या संपल्यानंतरच तो थांबला, असे सांगितले जाते.अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या. त्या विहिरीला हुतात्मा विहीर म्हटले जाते. विहिरीत १२० मृतदेह सापडले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माहितीनुसार एक हजारांपेक्षा जास्त लोक हुतात्मा झाले व १५०० पेक्षा जास्त जखमी झाले.जनरल डायर रॉलेट कायद्याचे कट्टर समर्थक होते म्हणून त्यांना त्याला विरोध मान्य नव्हता. त्यांचा समज होता की, या नरसंहारानंतर भारतीय घाबरून जातील; परंतु ब्रिटिश सरकारविरोधात पूर्ण देशात आंदोलन निर्माण झाले.

टॅग्स :Jallianwala Bagh massacreजालियनवाला बाग हत्याकांड