शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

गिरणाच्या लाभक्षेत्रातील धरणांमुळे जळगावला टंचाई पाणी आरक्षण जाहीर : मालेगावची वाढीव मागणी फेटाळली

By admin | Updated: November 4, 2015 23:29 IST

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)
जळगाव : गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रावर चणकापूर, हरणबारी या धरणांची निर्मिती झाल्यामुळे हे गिरणा धरण पूर्ण भरत नाही. त्यावेळी जळगाव जिल्ह्यातून विरोध न झाल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर, पारोळा, धरणगाव व एरंडोल या तालुक्यातील २५० गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. मालेगाव शहरासाठी चणकापूर धरणावरून व्यवस्था करावी असे सांगत त्यांची वाढीव पाण्याची मागणी पाणी आरक्षण बैठकीत बुधवारी फेटाळण्यात आली.
जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात पाणी आरक्षणाची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होते.
पालकमंत्री खडसे यांनी जिल्ह्यातील जलसाठ्यांमधील सद्यस्थितीचा आढावा घेतला. गिरणा जलाशय ते जामदा बंधारा येथून गिरणा नदीकाठावरील १०८ गावे, एरंडोल, भडगाव, चाळीसगाव, खरजईसह चाळीसगाव तालुक्यातील १४ गावांसाठी पाण्याचे आरक्षण करण्यात आले.
त्यानंतर जामदा बंधारा ते दहिगाव बंधारा या दरम्यान पाचोरा, हनुमंतखेडे व एरंडोल तालुक्यातील २५ गावे, भडगाव तालुक्यातील महिंदळे, पळासखेडे, टिटवी तांडा, आमडदे ग्रामीण पाणी पुरवठा योजना, कजगासह चार गावे तसेच पाचोरा तालुक्यातील माहिजीसह तीन गावे, एरंडोल तालुक्यातील आडगावसह १५ गावांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले. यासोबतच पिंपळगाव म्हाळसा, पिलखोड, गिरड, शिंंदी पाणी पुरवठा योजना, पिंपळगाव बुद्रुक पाणी योजना, लोण प्र.अ., कळमडूसह चार गावे व भडगाव शहरासाठी पाणी आरक्षण करण्यात आले. मन्याड धरणातून २१.५० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले. बोरी धरणात १७५ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या धरणात मृत साठा असल्यामुळे मात्र पाणी देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भोकरबारी धरणातील १० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. अंजनी मध्यम प्रकल्प १०५ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यात एरंडोल, धरणगाव व कासोदा या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणातून औद्योगिक बिगर सिंचनसाठी १८६४.१४ दलघफू तर नगरपालिकांसाठी बिगर सिंचनासाठी १४२१.३५ दलघफू पाणी आरक्षीत करण्यात आले आहे. या धरणातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी ३७१५.५७ दलघफू पाणी प्रस्तावित करण्यात आले.